शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 19:07 IST

आडगाव भोंबे येथे असलेल्या दोन एकर जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

हिसोडा ( जालना ) : घरची परिस्थिती हलाखीची. औरंगाबाद येथे अभ्यासिका लावून जिद्दीला परिश्रमाची जोड देत यश संपादन करून भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथील शेतकऱ्याचा मुलगा फौजदार बनला आहे. दयानंद भोंबे असे त्या मुलाचे नाव आहे.

श्रीरंग भोंबे यांची परिस्थिती हालाखीची. आडगाव भोंबे येथे असलेल्या दोन एकर जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. या हलाखीच्या परिस्थितीवरून मात करण्यासाठी दयानंदला काही तरी करायचे होते. त्याने या जिद्दीच्या जोरावरच शिक्षण घेत असतानाच भोकरदन येथे काम केले. त्यानंतर पदवी घेण्यासाठी औरंगाबादला गेला. त्याला पोलीस खात्यात नोकरी करायची इच्छा असल्याने तो कामाला लागला. 

अभ्यासिका लावून त्याने अभ्यास सुरू केला. त्याचे वडील श्रीरंग भोंबे उसनवारी करून त्याला पैसे पाठवायचे. त्यानेही जिद्द व चिकाटीच्या जोरावर ११ ते १२ तास अभ्यास केला. २०१९ मध्ये त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नुकताच त्याचा निकाल जाहीर झाला असून, यात अमोलने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला या परीक्षेत ३०० पैकी २५८ गुण मिळाले आहे. राज्यात तो बाराव्या स्थानी आहे. त्याचा नुकताच गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवाय, गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली. शिवाय, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

खचून न जाता अभ्यास करा आई-वडिलांनी शेती व मोलमजुरी करून मला शिक्षणासाठी पैसे दिले आहे. मी ही रात्रंदिवस जागून अभ्यास केला. त्याचे फळ मला मिळाले आहे. तरूणांनी ही खचून न जात अभ्यास करून जीवनात यशस्वी झाले पाहिजे.- दयानंद भोबे, पोलीस उपनिरीक्षक

 

टॅग्स :PoliceपोलिसJalanaजालना