शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

विद्युत धक्क्याने दहा शेळ्यांचा मृत्यू; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पशुपालकावर संकट

By विजय मुंडे  | Updated: June 27, 2023 19:38 IST

जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक वीज प्रवाह आला आणि विद्युत धक्का लागल्याने दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.

बदनापूर : महावितरणच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराने निष्काळजीपणा करीत गावठाण डीपीचे काम वेळेत केले नाही. परिणामी या कामामुळे जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने विद्युत धक्का लागून दहा शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दावलवाडी (ता. बदनापूर) शिवारात घडली. या घटनेमुळे संबंधित पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे एका गावठाण डीपीचे काम सुरू आहे. याकरिता विद्युत खांब उभा करण्यात आले आहेत व तारा जमिनीवर पडलेल्या आहेत. गावातील शिवाजी विठ्ठल गायकवाड यांच्या दहा बकऱ्या मंगळवारी सकाळी गावातच चरत होत्या. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक वीज प्रवाह आला आणि विद्युत धक्का लागल्याने दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड हे भूमिहीन असून, शेळी पालनावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

परंतु अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गायकवाड व ग्रामस्थांनी बदनापूर पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दिली आहे. त्यामध्ये वीज वितरण कंपनी व संबंधित गुत्तेदाराचे निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत सेलगाव येथील वीज वितरणचे अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर नंतर बोलतो असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली.तत्काळ नुकसान भरपाई द्याग्रामपंचायत सदस्य गणेश जगताप म्हणाले, महावितरण व संबंधित गुत्तेदाराचे निष्काळजीपणामुळे एका भूमिहीन पशुपालकाचे दहा शेळ्या दगावल्या असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गावठाण डीपीचे काम लवकर करण्यासाठी संबंधितांकडे आम्ही अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु हे काम लवकर झाले नाही आणि ही घटना घडली. आता महावितरणने तातडीने गायकवाड यांना नुकसान भरपाई द्यावी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना