शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खबऱ्यांसह टेम्पो चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:32 IST

उस्वद येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करुन विक्रीसाठी मंठा शहरात वाहतूक करण्यासाठी, पोलीस व महसूल प्रशासनावर नजर ठेवणाऱ्या दोन खबऱ्यांसोबत वाळू खाली करुन परतणा-या टेम्पोवर मंठा ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा/तळणी : उस्वद येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करुन विक्रीसाठी मंठा शहरात वाहतूक करण्यासाठी, पोलीस व महसूल प्रशासनावर नजर ठेवणाऱ्या दोन खबऱ्यांसोबत वाळू खाली करुन परतणा-या टेम्पोवर मंठा ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करुन १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मंठा शहरातील तुकाराम नगरात रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओ (एम. एच. २८ व्ही ४४४४) पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभूवन यांना आढळून आली. स्कॉपिओ चालक संतोष सदानंद अमृतसागर (रा. खोरवड ) व सोबत अविनाश भीमराव सरोदे ( रा. उस्वद ) यांची चौकशी केली असता, वाळूची वाहतूक करणा-या वाहनधारकांना महसूल व पोलीस अधिका-यांची माहिती देण्ययासाठी पाळत ठेवून असल्याचे कबूल केले. तसेच उस्वद येथील गजानन जाधव यांचा टेम्पो (एम. एच. २८ एबी ८८२४) व सुधाकर सरोदे यांचा टेम्पो (एम. एच. २८ एबी ५०२३) हे वाळू टाकून रिकामा टेम्पो घेऊन परतले. तर एक टेम्पो वाळू खाली करुन परतणार असल्याची माहीती दिली. त्याच दरम्यान राम सरोदे यांचा टेम्पो (एम. एच. २१ बी एच ८३७५) हा वाळू खाली करुन परतताना आढळून आला. टेम्पोचालक भागवत गंगाधर चोले (रा. बन, ता. सेनगाव ) याला विचारले असता, घारे कॉलनीतील रोडवर वाळू खाली केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणीत एक ब्रास वाळूसाठा आढळला. याप्रकरणी संतोष अमृतसागर, अविनाश सरोदे, भागवत चोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईत जीप, टेम्पो व एक ब्रास वाळू असा एकूण १५ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पो. नि. त्रिभुवन यांनी दिली.जालना : जिल्ह्यात अवैध वाळू उपशाने कळस गाठला आहे. यावर महसूल तसेच पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही अवैध वाळू उपसा सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी भोकरदन तालुक्यातील एका वाळू माफियाविरूध्द एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठविला होता. तो त्यांनी मंजूर केला असून, त्या वाळू माफियाची रवानगी हर्सूलच्या कारागृहात करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील रवींद्र रंगनाथ ठाले या वाळू माफियाविरूध्दाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठविला होता. तो त्यांनी लगेचच मंजूर केल्याने ठाले विरूध्द स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. ठालेला अटक करून त्याची एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांनी दिली. वारंवार वाळू उपसा न करण्यासह पोलीस, महसूल कर्मचा-यांना धमकावणे, तसेच त्यांना मारहाण करणे आदी प्रकार वाळू माफियांकडून सर्रासपणे केले जातात. पोलिसांच्या कारवाईमुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील वाळू माफियांमध्येही घबराट पसरली आहे. त्या भागातील वाळू माफिया देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. सर्वात जास्त वाळूचा अवैध उपसा हा अंबड, घनसावंगी तालुक्यातील गोदावरी पात्रातून होतो आहे. त्या भागात खुद्द जिल्हाधिकारी बिनवडे आणि पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी स्वत: गोदावरी पात्रात धडक कारवाई केली होती.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीArrestअटक