शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

टेंभुर्णीचा पाणीप्रश्न सुटेना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:17 IST

पाणीप्रश्न हा जणू काही टेंभुर्णीकरांच्या पाचवीलाच पुजलेला. मागील कित्येक वर्षांपासून टेंभुर्णीच्या पाणीप्रश्न सुटता सुटेना

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : पाणीप्रश्न हा जणू काही टेंभुर्णीकरांच्या पाचवीलाच पुजलेला. मागील कित्येक वर्षांपासून टेंभुर्णीच्या पाणीप्रश्न सुटता सुटेना. त्यामुळे पावसाळ्यातही टेंभुर्णीकरांचे पाण्यासाठी हाल सुरु आहे. नळाच्या पाण्यासाठी कोणत्याही ऋतूत टेंभुर्णीकरांना पंधरा दिवसांपेक्षा जास्तच दिवस वाट पाहावी लागत असल्याने नागरिकांत संतापाची लाट आहे. दरम्यान त्यात भर म्हणून सद्य:स्थितीत लोडशेडिंग वाढल्याने नागरिकांना मागील एक महिन्यापासून निर्जळीचा सामना करावा लागत आहे.पंधरा हजार लोकसंख्येच्या टेंभुर्णी गावात भारत निर्माणसह पाणीपुरवठ्याची आणखी एक योजना पूर्ण झालेली असली तरी या सर्व योजना गावकऱ्यांना वेळेवर पाणी पाजण्यासाठी कुचकामी ठरल्या आहेत. कधी पाईपलाईनची गळती, कधी विजेचा प्रश्न तर कधी पाण्याची कमतरता या ना त्या कारणाने गावक-यांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पाण्याचे २१ झोन असलेल्या या गावात झोनमधील नागरिकांना कोणत्याही ऋतूत पंधरा दिवसांच्या आत दुसरयांदा पाणी मिळालेले नाही. अशा वेळी पंधरा दिवस पाणी साठवता येईल अशी व्यवस्था सामान्य नागरिकाकडे नसल्याने अनेकांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. नसता महिन्याला पाचशे रुपयांपर्यंत विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. लोडशेडिंगचे कारण दाखवीत सध्या गावात एक महिन्यापासून पाणी नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थात चीड आहे.नागरिकांची गैरसोय बघता याकडे लोकप्रतिनिंधीनी गांभीर्याने लक्ष देऊन गावातील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.कुंभारपिंपळगावत हातपंप बंद, ग्रामस्थांची भटकंतीकुंभार पिंपळगाव : कुं.पिंपळगावात काही भागातील हातपंप नादुरुस्त असल्याने या भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे परिसरात दोन महिन्यापासून पावसाने दडी दिल्याने गावातील पाणी पुरवठा योजनेवरही परिणाम झाला आहे. त्यातच गावातील बहुतांश हातपंप बंद असल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लाग आहे. याकडे ग्रा.पं. चे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकात संताप आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgram panchayatग्राम पंचायत