शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तेलंगणाप्रमाणे भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्याचा कायदा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:34 IST

जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज सर्वत्र बेरोजगारी वाढत आहे, सरकारी भरतीला मर्यादा असतात, त्यामुळे खासगी उद्योगात कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ४० पेक्षा अधिक कंपन्यांनी स्टॉल उभारले असून, त्यातून अनेकांना हक्काचा रोजगार मिळेल असा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.रविवारी येथील शाम लॉज समोरील अर्जुन खोतकर व्यापारी संकुलात शिवसेनेतर्फे नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, संजय खोतकर, पंडित भुतेकर, संतोष मोहिते यांच्यासह अन्य शिवसैनिकांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोगारांना नोकरी मिळावी म्हणून यापूर्वीही आम्ही नोकरी मेळावा घेतला होता. त्यातील दोन जण तर उच्च पातळीवर नोकरी करत आहेत. याही मेळाव्यातून अनेकांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. या मेळाव्यात जालन्यासह, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांची दालने उभारली आहेत. त्यांना पात्र आणि कुशल मनुष्यबळाची मोठी गरज लक्षात घेऊन आपण त्यांना जालन्यात निमंत्रित केले आहे. भविष्यात ज्या प्रमाणे तेलंगणामध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणारा कायदा केला आहे, त्या पार्श्वभूमिवर आपल्या महाराष्ट्रात तसा कायदा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी भास्कर अंबेकर यांनीही विचार मांडले. ते म्हणाले की, आज नोकऱ्या नसल्याने अनेकजण बेरोजगार आहेत.त्यामुळे हा महोत्सव म्हणजे युवकांसाठी मोठी संधी आहे. मी आणि खोतकरांनी देखील महाविद्यालयीन जीवनात असतांना पोलिस दलात अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केले होते. असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नवगिरे यांनी केले.एक हजार जणांना संधीरविवारी पार पडलेल्या नोकरी मेळाव्यात विविध राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच बँक, एलआयसी यासह अन्य कंपन्यांचे स्टॉल येथे लावले होते.यावेळी दोन हजारपेक्षा अधिक बेरोजगारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी जवळपास एक हजार बेरोजगारांना नोकरीची हमी मिळाल्याची माहिती संयोजकांनी दिली.

टॅग्स :UnemploymentबेरोजगारीjobनोकरीArjun Khotkarअर्जुन खोतकर