शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

शिक्षक संवेदनशील असावाच : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

जालना : शैक्षणिक वातावरणात अनेक घटना घडतात, ज्यामुळे नकारात्मक सूर येतो. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थी ...

जालना : शैक्षणिक वातावरणात अनेक घटना घडतात, ज्यामुळे नकारात्मक सूर येतो. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थी हितासाठी शिक्षकाने संवेदनशील असायलाच पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी रविवारी साने गुरुजी कथामाला पदाधिकारी बैठकीत बोलताना व्यक्त केले.

जुना जालना भागातील भाग्यनगर परिसरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिमा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, रामदास कुलकर्णी, बी. एम. सय्यद, मीनाक्षी देशमुख, प्रा. रमाकांत कुलकर्णी, जगदीश वैष्णव, अंबादास नन्नवरे यांची उपस्थिती होती.

पुढे कुलकर्णी म्हणाले की, आज एकाच शाळेत अनुदान, विनाअनुदानासह अनेक स्तर आहेत की, ज्यामुळे शिक्षकांची मानसिकता कशी टिकेल, असा प्रश्न आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकवितो, तोच खरा शिक्षक असतो, असे सांगून साने गुरुजींच्या संवेदनशील विचारांचा शोध घेणारा शिक्षक असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यापेक्षा प्रश्न आणि समस्येत अडकलेला शिक्षक यातून सुटला पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. बैठकीत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, जालना शाखेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी तयार केलेल्या ऑनलाईन शिक्षण मोबाईल स्टॅण्डची शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी प्रशंसा केली. साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी पवन कुलकर्णी यांनी आभार मानले.

फोटो

जालना : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पदाधिकारी बैठकीत हेरंब कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.