शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जालना जिल्ह्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:18 IST

राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.वृक्षलागवडीसाठी वेगवेगळ्या विभागांना त्यांनी किती वृक्ष लागवड करावी यासाठीचे नियोजन वनविभागाने केले असल्याची माहिती वनविभागातील कान्हेरे यांनी दिली. एकूणच आमच्या वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी शिंदे आणि अन्य अधिकाऱ्यांची एक बैठक होऊन त्यांच्या सूचनेनुसार हे उदिष्ट ठरवल्याचे कान्हेरे यांनी सांगितले.यात वनविभागाने साडेचार लाख, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सर्वात जास्त म्हणजे १० लाख वृक्ष लागवड करावयाची आहे. कृषी विभागाला ५ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले असून, यात नगर विकास, औद्योगिक, जलसंपदा, उच्व व तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींना मिळून हे २८ लाख वृक्ष लागवड करावायची आहे. यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून झाडे लावण्यासाठीचे खड्डे करण्याचे काम अंतिम पातळीवर असल्याचे सांगण्यात आले.ही वृक्ष लागवड करण्यासाठी अंदाजित १२ कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही वृक्ष लागवड करताना लिंब, चिंच, बांबू, सागवान, खैर तसेच विविध प्रकारची फळबागांशी निगडीत झाडे लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाenvironmentवातावरण