शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

टँकरची कारला धडक; जालन्याचा व्यापारी ठार

By admin | Updated: March 7, 2016 01:07 IST

दोघे गंभीर : किणी टोलनाका परिसरातील दुर्घटना; विचित्र अपघाताने महामार्गावरील वाहनधारक शहारले

कोल्हापूर/किणी : पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाका येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भरधाव टॅँकरने कारला धडक दिल्याने जालना येथील व्यापारी जागीच ठार झाला. तसेच ट्रकचालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. गौतम मनोहर वाधवा (वय २४, रा. नाथनगर, जालना) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याचा मित्र प्रभात हरिप्रसाद देवीदान (२४, रा. जालना) व ट्रकचालक शब्बीर अबू शेख (२८, रा. बावधन, ता. वाई, जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले. भरधाव टॅँकरचा टायर फुटल्याने रस्ता दुभाजकावरून तो पलीकडील रस्त्यावर येऊन उलटला. यावेळी त्याने कारला व आणखी एका ट्रकला धडक दिली. या विचित्र अपघाताचे दृश्य पाहून वाहनधारकांच्या अंगावर शहारे उभे राहत होते. टँकर शिवपार्वती मिल्क ट्रान्स्पोर्टचा असून, तो मुंबईहून वारणानगरला येत होता. याबाबत अधिक माहिती अशी, गौतम वाधवा याचे जालन्यामध्ये कापड दुकान आहे. त्याच्यासह मित्र प्रभात देवीदान व जिमित व्यवहारे यांनी गोव्याला जाण्याचा बेत आखला. जिमित हा पुण्यामध्ये एम. बी. ए.चे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि. ४) गौतम, प्रभात हे दोघेजण कार घेऊन पुण्यामध्ये आले. तेथून जिमितला घेऊन मध्यरात्री ते गोव्यात पोहोचले. शनिवारी दिवसभर गोवा फिरून रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ते पुण्याला येण्यास निघाले. टोप-वाठारच्या दरम्यान हॉटेलवर तिघांनी दुपारचे जेवण केले.त्यानंतर ते पुन्हा पुण्याकडे रवाना झाले. यावेळी प्रभात कार चालवीत होता. त्याच्या डाव्या बाजूला जिमित बसला होता; तर गौतम हा पाठीमागे दरवाजाला उशी लावून झोपला होता. काही अंतर गेले असता किणी हायस्कूल ते टोलनाक्याजवळ पुण्याकडून भरधाव येणाऱ्या टँकरचा टायर फुटल्याने तो रस्ता दुभाजक तोडून उजव्या बाजूच्या रस्त्यावर येऊन उलटला. यावेळी ट्रँकरची कारच्या पाठीमागील दरवाजाला धडक बसल्याने गौतम जागीच ठार झाला. यावेळी या टँकरने आणखी एका ट्रकला धडक दिली. कारचालक प्रभात देवीदान व टँकरचालक शब्बीर शेख हे गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये टॅँकरसह कार व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गौतमचा मृतदेह ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आला. त्याच्या अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांचे पै-पाहुणे गांधीनगर येथे असल्याने त्यांनी ‘सीपीआर’मध्ये धाव घेतली. त्याचा मृतदेह पाहून आतेबहीण मेघाणी यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्या धक्क्याने काहीवेळ त्या बेशुद्ध पडल्या. मृत गौतमच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली. (प्रतिनिधी) किणी टोलनाका परिसर मृत्यूचा सापळा किणी टोलनाक्याजवळ काही दिवसांपूर्वी भरधाव कार दुभाजकाला धडकून अहमदाबाद येथील बांधकाम व्यावसायिक चिराग मनसुभाई पांचाल (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला होता; तर चौघेजण गंभीर जखमी झाले होते. मृत चिराग हा आणखी दोन मित्रांसोबत गोवा येथील मोटारसायकल शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना अपघात झाला होता. किणी टोलनाका परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून हा परिसर वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. बालपणीचे मित्रगौतम, प्रभात व जिमित हे बालपणापासूनचे मित्र. कोठेही फिरायला जायचे असेल तर तिघेजण जात होते. गोवा पाहून ते घरी परतत होते. पुण्यामध्ये जिमितला सोडून ते पुढे जालन्याला जाणार होते. जेवण करताना तिघेही बालपणीच्या गप्पांत रंगले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांत गौतमचा अपघाती मृत्यू झाल्याने दोघेजण भेदरून गेले. त्यांना आपण काय बोलतो हेच कळत नव्हते. इतर वाहनधारकांनी त्या दोघांना धीर देत ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.