शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

दोषारोपपत्र दाखल करताना खबरदारी घ्या- रजनीश सेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:53 IST

दोषारोपपत्र दाखल करताना ते कायद्याच्या दृष्टीने कसे टिकेल, याची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनेक प्रकरणांमध्ये आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्याला होणाऱ्या शिक्षेचे प्रमाण हे सध्या पाहिजे तेवढे नाही. हे प्रमाण वाढविण्यासाठी ज्यावेळी न्यायालयात संबंधित आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल करताना ते कायद्याच्या दृष्टीने कसे टिकेल, गुन्ह्यातील साक्षीदार फितूर कसे होणार नाहीत, याची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण दोन दिवसांच्या तपासणी कार्यक्रमा अंतर्गत अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिले.गेल्या दोन दिवसांपासून सेठ यांनी जालना पोलिसांचा सूक्ष्म आढावा घेतला. तसेच त्यांना आगामी काळात घ्यावयाची काळजी या संदर्भात सूचना दिल्याचे ते म्हणाले. विधासभा निवडणुका, बकरी ईद, गणेश उत्सव, नवरात्र आदी सणवार येणार आहेत. ते शांततेत पार पडावेत म्हणून समाजातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना प्रतिबंधित करणे, यासह त्या काळात साध्या वेशात पोलिसांना ठेवून समाजात काय चालले आहे, याचा आढावा घेणार आहोत. कुठल्याही स्थितीत कायदा मोडणा-यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा सेठ यांनी दिला.जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा सुरू असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाशी समन्वय ठेवण्याचे निर्देशही सेठ यांनी उपस्थित पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांना दिले. यापूर्वीही वाळू तस्करांवर कारवाई केल्याचे पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली. जालना जिल्ह्यातील दहा पोलीस ठाण्याचे प्रस्ताव गेल्या कित्येक वर्षापासून धूळ खात पडून असल्याबद्दल त्यांना विचारले असता, ते म्हणाले की, लवकरच हे प्रस्ताव मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.आगामी सहा महिने महत्त्वाचे : सर्वांनी कायद्याचे पालन करावेआगामी सहा महिने हे पोलिसांसाठी ज्या प्रमाणे महत्त्वाचे आहेत, त्याच प्रमाणे ते जनतेसाठी देखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सणवार, निवडणुकांच्या काळात नागरिकांनी कायद्याचे पालन केल्यास कुठलेच प्रश्न निर्माण होणार नाहीत.परंतु या काळात जर कोणी मुद्दामहून कायद्याचे उल्लंघन करत असतील तर त्यांची गंभीर दखल पोलिसांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे कायदा पाळून समाजातील शांतता अबाधित ठेवण्यावर पोलिसांचा भर राहील, असे सेठ यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाCourtन्यायालय