शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

तहसील कार्यालयात दुपारीच शुकशुकाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:10 IST

तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.जिल्ह्यात पावसाने उशिराने का होईना; पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. शाळा महाविद्यालयाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामुळे उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखल, आदीसह कागदपत्र गोळा करण्यासाठी विद्यार्थी, पालकवर्गाची रेलचेल वाढली आहे. मात्र तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दुपारचे साडेतीन वाजले तरी कार्यालयात गैरहजर होते. यामुळे अनेकांची गैरसोय झाली. शासकीय कार्यालयात येणा-यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने कर्मचा-याची दुपारची जेवणाची वेळ अर्धातास केली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याची सर्वशी जबाबदारी कार्यालयीन प्रमुखाची असणार आहे. मात्र जुन्या सवयीनुसार कर्मचारी तासनतास कार्यालयातून गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कार्यालयीन प्रमुखाचे असेल, असे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. मात्र येथील तहसील कार्यालयातील सर्वच विभागप्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे शासकीय कर्मचारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या नावाखाली कार्यालयातून तासन्तास गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागGovernmentसरकार