शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

'तिखट मिरचीचा 'गोडवा', शेतकऱ्याचा नाद खुळा'; ११ एकर मिरचीतून घेतले ५५ लाखांचे उत्पन्न

By विजय मुंडे  | Updated: July 19, 2023 16:00 IST

योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्न; शेतकऱ्यांच्या मिरची शेतीतून ५० मजुरांच्या हातालाही मिळाले काम

- फकिरा देशमुखभोकरदन (जि.जालना) : ११ एकरात विविध प्रकारच्या मिरचीची लागवड करून एका शेतकरी कुटुंबाने तीन महिन्यांत तब्बल ५५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आणखी दोन महिने ही मिरची विक्री होणार असून, मिरचीला असाच भाव राहिला तर उत्पन्न एक कोटीच्या घरात जाणार आहे. तिखट मिरचीचा 'गोडवा' चाखण्याची किमया धावडा (ता.भोकरदन) येथील शेतकरी कुटुंबाने साधली आहे.

भोकरदन तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. यावर्षी ५ हजार हेक्टरमध्ये मिरची लागवड झाली आहे. धावडा येथील शेतकरी एकबालखाँ अक्रमखाँ पठाण, खालेदखाँ पठाण या भावंडांनी ११ एकरमध्ये १३ ते ३० एप्रिल या कालावधीत गादीवाफे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर टाकून ठिबकद्वारे पाणी देऊन सिमला, पिकाडोर, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या मिरचीची चार बाय सव्वा अंतरावर ठिबक नळीच्या दोन्ही बाजूने लागवड केली. या लागवडीसाठी पठाण कुटुंबाला १० लाख ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे केलेला खर्च निघतो की नाही याची भीती या कुटुंबाला होती;

परंतु एकबालखाँ पठाण यांनी न डगमगता मिरची पिकावर औषधी, खते, फवारणी केली. शेवटी मिरचीसाठी पाणी कमी पडू लागले तेव्हा टँकरने पाणी विकत घेऊन मिरची जोपासली. जूनमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. त्यांना ११ हजार, १० हजार, ९ हजार असा भाव मिळाला. तर सिमला मिरचीला ४ हजार ५०० व पिकडोरला सुद्धा ४ हजारांचा भाव मिळाला. त्यामुळे आजवर त्यांना ५५ लाख ३० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले. यापुढील काळात असाच भाव राहिला तर त्यांचे उत्पन्न एक कोटीच्या घरात जाणार आहे. शिवाय दोन महिन्यांनंतर त्यांना लाल मिरचीचे उत्पन्न मिळणार आहे.

योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्नआम्ही किराणा व्यावसायिक असलो तरी शेती कसण्याची आवड आम्ही जोपासली आहे. यातूनच यंदा ११ एकर शेतात विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापन आणि कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या कष्टामुळे सध्या चांगले उत्पन्न मिळत आहे. आजवर ८ तोडे झाले असून, त्यासाठी ४० महिला मजूर दररोज शेतात कामाला येतात. शिवाय १० सालदार आहेत. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेती केली तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.- एकबालखाँ पठाण, शेतकरी धावडा

टॅग्स :FarmerशेतकरीCropपीकJalanaजालना