शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

संशयाने उद्ध्वस्त केला संसार; पत्नीसह मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:24 IST

दोघींची आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तोडला दरवाजा

ठळक मुद्देरुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलेपती सह गावातील तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

आष्टी (जालना) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह मुलीचा धारधार शास्त्राने खून केला. ही घटना परतूर तालुक्यातील अकोली गावात बुधवारी ( दि. २ ) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. ज्योती शहाजी देशमुख (२६) व ऋतुजा शहाजी देशमुख (०६) अशी मृतांची नावे आहेत.

अकोली गावातील शहाजी गोविंदराव देशमुख यांचा मागील वर्षभरापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे पती- पत्नीत सतत भांडणे होत असत. बुधवारी सकाळी शहाजी यांनी घराला आतून कडी लावून पत्नीसह ६ वर्षाच्या मुलीवर धारधार शस्त्राने वार केले. दोघींची आरडाओरड शेजाऱ्यांना ऐकू आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी ज्योती व ऋतुजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. 

शेजाऱ्यांनी त्यांना आष्टी येथील प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून दोघींनाही मयत घोषित केले. या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ नागेश रूस्तूम सोळंके यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शहाजी देशमुख यांच्यासह गावातील इतर तीन जणांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी शहाजी देशमुख पोलिसांच्या ताब्यात असून इतर तिघे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ दोन पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस. डी. बांगर, सपोनि. एस. बी. सानप भेट दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनJalanaजालना