शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

डॉक्टरांअभावी शस्त्रक्रिया लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:29 IST

जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून जवळपास ८० महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून जवळपास ८० महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आल्या आहेत. त्यांची आवश्यक असणारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी जेवण तसेच अन्य काही पदार्थ न खाण्याचा सल्ला या महिलांना देण्यात आल्याने दोन दिवसांपासून आम्ही जेवणही केले नसल्याचे महिलांनी सांगितले.या जिल्हा रूग्णालयातील प्रकारा संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांना विचारले असता, आपण बैठकीत असून, नंतर बोलतो असे सांगितले.जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रारंभी गाव पातळीवर आरोग्य शिबीर घेऊन महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी राजी करण्यात आले होते. त्यांना मंगळवारीच जालन्यातील जिल्हा रूग्णालयात बोलावण्यात आले. त्यांची मंगळवारीच शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. तसेच त्यांना जिल्हा रूग्णालयातील एका हॉलमध्ये विश्राम करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवसांपासून या महिला येथे थांबल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.एकीकडे जालन्यात ४० कोटी रूपये खर्च करून महिला व बाल रूग्णालय उभारले आहे. असे असताना या शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलांना जिल्हा सामान्य रूग्णालयात का पाठवले असा सवाल केला जात आहे. त्यातच दोन दिवसांपासून महिला शस्त्रक्रियेसाठी आल्या असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी का आले नाहीत, की तसेच नियोजन असून ते डॉक्टर गैरहजर राहिले का, असेही विचारले जात आहे.या शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले आहे. ते उद्दिष्ट हे मार्च महिन्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असते,या शस्त्रक्रियेस राजी झालेल्या महिलांनाही थोडीबहूत आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. वैद्यकीय अधिकारी न आल्यानेच या शस्त्रक्रिया लांबल्याचे बोलले जाते.उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर मिळतात अनेक लाभडॉक्टरांनाही या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास त्यांना वेतनवाढीसह त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद घेऊन प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच प्रत्येक जिल्ह्याला यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिलेला असल्याने तो खर्च करणेही अनिवार्य असते.महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचे महत्व पटवून देण्यासह लोकसंख्या वाढीचे दुष्परिणामही समजावून सांगावे लागत असल्याने हे मोठे जिकिरीचे काम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय