शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी आधार लिकिंगचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:07 IST

जवळपास ४०१ शेतकऱ्यांचे बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी आधारलिकिंग नसल्याने अनुदान जमा करण्यात अडचणी येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतु दिलेल्या मुदतीत खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील तूर उत्पादक ७६८ आणि हरभरा उत्पादक १ हजार ९०० असे २ हजार ६६८ शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत. मात्र त्यापैकी जवळपास ४०१ शेतकऱ्यांचे बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी आधारलिकिंग नसल्याने अनुदान जमा करण्यात अडचणी येत आहे.जिल्ह्यात हमीभावाने तूर, आणि हरभरा विक्रीसाठी जालना, भोकरदन, आष्टी, परतूर, अंबड, जाफराबाद, मंठा, तीर्थपुरी येथील हमीभाव केंद्रावर तूर, हरभ-याची खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या शेतमाल मुदतीत खरेदी करता आला नाही. शेतक-यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. यामुळे तूर, हरभरा उत्पादक पात्र लाभार्थ्यांची यादी मागविण्यात आली यामंध्ये तूर उत्पादक ७६८ आणि हरभरा उत्पादक १९०० शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर हे अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया नाफेडच्या मुंबई येथील कार्यालयातून ही आॅनलाईन प्रक्रिया सुरु आहे. ज्या शेतक-यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही, अशा शेतक-याची यादी जिल्हा मार्केटींग विभागाकडे पाठविण्यात आली आहे. यामध्ये तूर उत्पादक १ आणि हरभर उत्पादक ४०० शेतक-यांचे बँक खात्याचे आधार लिंक नसल्याचे कळविण्यात आले होते.संबंधित शेतक-यांना आधार लिंक करण्याच्या सूचना शेतक-यांना दिल्या आहेत.टप्प्या-टप्प्याने मिळणार अनुदानजिल्ह्यात फरक अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयापैकी ४०१ शेतक-यांचे आधार लिकिंग नसल्याने नाफेडच्या मुंबई येथील कार्यालयातून जिल्हा मार्केटिंग विभागाला आल्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी आधारलिंक नसलेल्या शेतक-यांना या विषयी सूचना केलेल्या आहेत. बँक खात्याचे आधार लिंक झाल्यानंतर शेतक-यांच्या खात्यात टप्प्या- टप्प्याने अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे..हमीभावापेक्षा अल्पदराने खाजगी बाजारपेठेत शेतमालाची खरेदी केली जात होती. यामुळे शेतक-यांचे प्रति क्विंटल दीड ते दोन हजार रुपये नुकसान होत असल्याने शेतक-यांत संताप होता. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. मात्र त्याला सुद्धा विविध अडथळे येत असल्याने शेतकरी वैतागले आाहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAdhar Cardआधार कार्डBanking Sectorबँकिंग क्षेत्र