शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

अनुदानासाठी आधार लिकिंगचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:07 IST

जवळपास ४०१ शेतकऱ्यांचे बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी आधारलिकिंग नसल्याने अनुदान जमा करण्यात अडचणी येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतु दिलेल्या मुदतीत खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील तूर उत्पादक ७६८ आणि हरभरा उत्पादक १ हजार ९०० असे २ हजार ६६८ शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत. मात्र त्यापैकी जवळपास ४०१ शेतकऱ्यांचे बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी आधारलिकिंग नसल्याने अनुदान जमा करण्यात अडचणी येत आहे.जिल्ह्यात हमीभावाने तूर, आणि हरभरा विक्रीसाठी जालना, भोकरदन, आष्टी, परतूर, अंबड, जाफराबाद, मंठा, तीर्थपुरी येथील हमीभाव केंद्रावर तूर, हरभ-याची खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या शेतमाल मुदतीत खरेदी करता आला नाही. शेतक-यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. यामुळे तूर, हरभरा उत्पादक पात्र लाभार्थ्यांची यादी मागविण्यात आली यामंध्ये तूर उत्पादक ७६८ आणि हरभरा उत्पादक १९०० शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर हे अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया नाफेडच्या मुंबई येथील कार्यालयातून ही आॅनलाईन प्रक्रिया सुरु आहे. ज्या शेतक-यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही, अशा शेतक-याची यादी जिल्हा मार्केटींग विभागाकडे पाठविण्यात आली आहे. यामध्ये तूर उत्पादक १ आणि हरभर उत्पादक ४०० शेतक-यांचे बँक खात्याचे आधार लिंक नसल्याचे कळविण्यात आले होते.संबंधित शेतक-यांना आधार लिंक करण्याच्या सूचना शेतक-यांना दिल्या आहेत.टप्प्या-टप्प्याने मिळणार अनुदानजिल्ह्यात फरक अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयापैकी ४०१ शेतक-यांचे आधार लिकिंग नसल्याने नाफेडच्या मुंबई येथील कार्यालयातून जिल्हा मार्केटिंग विभागाला आल्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी आधारलिंक नसलेल्या शेतक-यांना या विषयी सूचना केलेल्या आहेत. बँक खात्याचे आधार लिंक झाल्यानंतर शेतक-यांच्या खात्यात टप्प्या- टप्प्याने अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे..हमीभावापेक्षा अल्पदराने खाजगी बाजारपेठेत शेतमालाची खरेदी केली जात होती. यामुळे शेतक-यांचे प्रति क्विंटल दीड ते दोन हजार रुपये नुकसान होत असल्याने शेतक-यांत संताप होता. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. मात्र त्याला सुद्धा विविध अडथळे येत असल्याने शेतकरी वैतागले आाहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAdhar Cardआधार कार्डBanking Sectorबँकिंग क्षेत्र