शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या हा पर्याय नाही -जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:13 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे जरी खरे असले तरी, या समाजातील युवकांनी आत्महत्या करून आपले अमूल्य जीवन संपवू नये. युवकांमध्ये जे नैराश्य आले आहे ते दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही समुपदेशन यात्रा काढली आहे. आता पर्यंत ३६ गावांना यातून भेटी दिल्या असल्याची माहिती या यात्रेचे संयोजक आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे जरी खरे असले तरी, या समाजातील युवकांनी आत्महत्या करून आपले अमूल्य जीवन संपवू नये. युवकांमध्ये जे नैराश्य आले आहे ते दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही समुपदेशन यात्रा काढली आहे. आता पर्यंत ३६ गावांना यातून भेटी दिल्या असल्याची माहिती या यात्रेचे संयोजक आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आ. जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा वर्षभरापूर्वीपासून पेटला आहे. आधी लोकशाही मार्गाने मूक मोर्चे काढले त्याचा परिणाम झाला नाही. त्या नंतर आता ठोक मोर्चे, चक्का जाम, ठ्यिा आंदोलन, मुंडण आंदोलन आदी आंदोलनातून राज्य सरकारकडे आम्ही आरक्षणासाठी मागणी करत आहोत. मात्र शासनाकडून केवळ चुकीचे मुद्दे उपस्थित करून समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही आ. जाधव यांनी केला. आज सर्व पक्षात मराठा समाजाचे नेत आहेत, परंतु ते एकत्र नाहीत. त्यामुळे सरकार वेळकाढूपणा करत आहे. मराठा समाजाने त्यांचा दबावगट तयार केल्यास आरक्षणाची लढाई सोपी होऊ शकते, मात्र समाज एकत्र येण्यास तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आरक्षणासाठी स्वतंत्र अध्यादेश काढून त्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावून त्यावर मंथन करण्याची गरज आहे. आज अनेकजण भावनिक होऊन आपले जीवन आत्महत्या करून संपवत असल्याने त्यांचा संसार उघड्यावर येत आहे. आपला समाज हा रडणारा नाही तर लढणारा समाज आहे. त्यामुळे खचून न जाता हिंमतीने तोंड देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी संजय लाखे पाटील यांनी सांगितले की, मराठा आंदोलनात मुंडण आंदोलन करून एक विक्रम केला आहे. त्याची नोंद लवकरच लिम्का बुकमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगून येत्या काही दिवसात आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच प्रशांत वाढेकर यांनी औरंगाबादेतील अंबादास दानवे यांनी ज्या तरूणाला लाथा मारल्या तो तरूण जालना जिल्ह्यातील आहे, त्याचे चित्रीकरण पाहून आम्ही अंबादास दानवे विरोधात आयुक्तां कडे तक्रार करणार असल्याचेही वाढेकर म्हणाले. पत्रकार परिषदेस राजेश राऊत, विष्णू पाचफुले, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, कृष्णा पडूळ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव