शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

साखरेच्या भावाने उचांक गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST

जालना : जागतिक स्तरावर साखरेचे भाव वधारल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळणार असून, यामुळे साखर कारखान्याचा आर्थिक बोजा कमी ...

जालना : जागतिक स्तरावर साखरेचे भाव वधारल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळणार असून, यामुळे साखर कारखान्याचा आर्थिक बोजा कमी होऊन शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीनुसार भाव देण्यासोबतच पूर्व हंगामासाठी पैसा उपलब्थ होणार आहे. यामुळे कारखान्यांना दरवर्षीप्रमाणे पूर्वहंगाम कर्जासाठी बँकांची पायरी चढावी लागणार नाही, अशी चिन्हे आहे.

ब्राझीलमध्ये थंडी आणि उन्हाचा तडाखा बसल्याचे

परिणाम आता दिसू लागले आहेत. त्याचा फायदा भारताला

मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच आपल्या शिपमेंटच्या पाच महिने आधी साखर निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. थंडीचा कडाका सुरू

असल्याने ब्राझीलमध्ये उत्पादन घसरणीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी साखर खरेदीदारांना भारताने ॲडव्हान्स स्वरुपात साखर पुरवठ्याचे करार करण्यास पुढाकार घेतला आहे.

जगातील सर्वात मोठे साखर उत्पादक आणि निर्यातदार

असलेल्या ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन आधी उन्हाचा तडाखा आणि आता थंडीमुळे घसरण्याच्या मार्गावर आहे. ब्राझीलमध्ये थंडी आणि उन्हामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, संभाव्य घसरणीपूर्वीच साखरेचे दर तीन वर्षाच्या आपल्या उच्चांकावर पोहोचले आहेत. यादरम्यान, खरेदीदारांनी जगातील द्वितीय क्रमांकाचा साखर उत्पादक देश भारताकडून आधीच साखर पुरवठ्याचे करार करण्यावर भर दिला आहे. परिणामी आतापर्यंत व्यापाऱ्यांनी डिसेंबर आणि जानेवारीत शिपमेंटसाठी ५,००,००० टन कच्ची साखर फ्री ऑन बोर्ड (एफओबी) या आधारावर ४३५ डॉलर आणि ४४० डॉलर प्रतिटन यादरम्यान करार सुरू केले आहेत. भारतीय व्यापारी नेहमी एक अथवा दोन महिने आधी करार करतात. सरकारकडून विदेशी साखर विक्रीसाठी अनुदान जाहीर झाल्यावर साखर निर्यात करतात. मात्र, जागतिक स्तरावर दरवाढ झाल्याने सरकारच्या मदतीशिवाय साखर निर्यातीला चांगले दिवस आले आहेत. साखर कारखान्यांनी निर्यातीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. उच्चांकी निर्यात होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील चांगल्या दराचा फायदा कारखान्यांना

झाला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ७० लाख टन निर्यातीची शक्यता आहे. ही आतापर्यंत उच्चांकी निर्यात असेल. भारताने २०२०-२१ च्या दरम्यान ६० लाख टन साखर निर्यातीसाठी अनुदान जाहीर केले आहे. अलिकडेच केंद्र सरकारने साखर निर्यातीचे अनुदान ६००० मेट्रिक टनावरून घटवून ४००० मेट्रिक टन केले आहे. जालना बाजारपेठेत साखरेचे भाव ३५५० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.