शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

हलाखीच्या परिस्थितीने संघर्ष शिकवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:44 IST

छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत व स्वामी विवेकानंदाना आदर्श मानून काम करायला सुरुवात केली, भारत विकास गु्रपच्या (बीव्हजी) माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हनुमंत गायकवाड आपले अनुभव सांगत होते.

ठळक मुद्देहनुमंत गायकवाड : अंबड येथे व्याख्यानातून सांगितला राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : लहानपणी आमच्या घरी वीज नव्हती. त्या वेळी ज्यांच्याघरी वीज आहे ते लोक खुप श्रीमंत असेल असे वाटायचे. हाल्लाखीच्या परिस्थितीने मला अपमान सहन करायला शिकवले. लहानपणी वडिलांसोबत एका व्याख्यानाला गेलो असता, तिथे व्याख्याते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्यावर व्याख्यान केले. त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत व स्वामी विवेकानंदाना आदर्श मानून काम करायला सुरुवात केली, भारत विकास गु्रपच्या (बीव्हजी) माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हनुमंत गायकवाड आपले अनुभव सांगत होते.येथील यशवंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुफण्यासाठी व्याख्याते म्हणून त्यांनी रहीमतपूर ते राष्ट्रवादी भवन या प्रवासादरम्यानचे संघर्षमय अनुभव सांगितले. यावेळी सर्व सयोजन समीतील सदस्य व शहरातील मोठया संख्येने युवक, ज्येष्ठ, महिला, युवती यांची लक्षणीय उपस्थिती होती.गायकवाड म्हणाले, चौथीमध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे पुढील शिक्षणासाठी रहिमतपूर मधून थेट पुण्याला आलो. येथे दहावी झाल्यानंतर तंत्रनिकेतन मधून डिप्लोमा पूर्ण करत असताना आर्थिक परीस्थीती हलाखीची असल्यामुळे जॅम-सॉस विकले. पेंटींगचे काम केले. शिकवणी घेतली. १९ व्या वर्षी इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना मी भारत विकास ग्रुप या नावाने संस्थेची नोंदणी केली. पुण्यातील टेल्को कंपनीत नोकरीला लागलो. त्यावेळी कंपनीत अडीच कोटी रुपये किंमतीचे वायर पडून होते. त्याचा पुर्नवापर करुन मी कंपनीचे पैसे वाचवले. व्यवस्थापकीय संचालक यांनी मला बोलावून तुम्हाला काय हवे आहे, असे विचारले. मी गावाकडील मुलांना आपल्या कंपनीमध्ये नोकरी देण्याची विनंती केली. जागा नसल्याने त्यांनी स्वच्छतेसाठी जागा आहेत, तेथे काम करुन शकतात का, असे विचारले. ते काम माझ्या मित्रांनी ‘बीव्हीजी’मार्फत स्वीकारले. त्यानंतर आम्हाला अनेक कामे मिळत गेली. मी स्वप्न बघितले की, राष्ट्रपती भवनाचे काम आपल्याला मिळायळा हवे. आज हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व अभिवान आहे. आज राष्ट्रपतीभवन, पंतप्रधान निवास, लोकसभा, राज्यसभा केंद्र सरकारचे विविध कार्यालय तसेच मध्येप्रदेश, आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र व देशातील विविध राज्यात बीव्हीजीच्या माध्यमातून अतिमहत्वाची रुग्णवाहिकासेवा, पोलिसांची वाहनसेवा, स्वच्छता सेवा पुरवली जाते. बीव्हीजी इतर देशांमध्येही सेवा पुरवत आहे. आज लाखो लोक या संस्थेते काम करत आहेत. यापुढेही मला राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन द्यावयाचा असल्याचे ते म्हणाले. कोणतेही काम छोटे नसते आपल्या कामातूनच आपली वेगळी ओळख निर्माण करावी. माझ्या यशामध्ये कुटुंबीयांसोबत माझ्यासोबत काम करणाºया प्रत्येक कर्मचाºयाचा वाटा असल्याचे ते आवर्जुन म्हणाले. रामेश्वर त्रिमुखे यांनी सूत्रसंचालन केले तर अ‍ॅड. कृष्णा शर्मा यांनी आभार मानले.