शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन तालुक्यात दमदार एन्ट्री: तासभर झालेल्या पावसाने पाणीच पाणी

By दिपक ढोले  | Updated: July 2, 2023 19:13 IST

पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता.

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील काही भागांत रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते. या पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेल्या पेरण्याला वेग आला आहे.

यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता; परंतु पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. शिवाय, अनेक शेतकऱ्यांच्या मिरचीचे पीक पाण्याअभावी सुकून जात होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. अनेक शेतकऱ्यांनी तांब्याने मिरचीला पाणी देण्यास सुरुवात केली होती. त्यातच रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भोकरदन, पेरजापूर, आव्हाना, गोकुळ, इब्राहिमपूर, आलापूर, फत्तेपूर, मासंनपूर, चोरहाळा, विरेगाव, कुंभारी, कोदोली, टाकळी, सिपोरा बाजार, नांजा, क्षीरसागर, सुभानपूर, मनापूर, मलकापूर गावांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

जवळपास तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही शेतांमध्ये पाणी देखील साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी पावसामुळे समाधान व्यक्त केले आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्याला वेग आला आहे. अनेकांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील काही भागाला अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तेथील पेरण्या रखडल्या असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊस