शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भोकरदन तालुक्यात दमदार एन्ट्री: तासभर झालेल्या पावसाने पाणीच पाणी

By दिपक ढोले  | Updated: July 2, 2023 19:13 IST

पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता.

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील काही भागांत रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते. या पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेल्या पेरण्याला वेग आला आहे.

यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता; परंतु पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. शिवाय, अनेक शेतकऱ्यांच्या मिरचीचे पीक पाण्याअभावी सुकून जात होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. अनेक शेतकऱ्यांनी तांब्याने मिरचीला पाणी देण्यास सुरुवात केली होती. त्यातच रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भोकरदन, पेरजापूर, आव्हाना, गोकुळ, इब्राहिमपूर, आलापूर, फत्तेपूर, मासंनपूर, चोरहाळा, विरेगाव, कुंभारी, कोदोली, टाकळी, सिपोरा बाजार, नांजा, क्षीरसागर, सुभानपूर, मनापूर, मलकापूर गावांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

जवळपास तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही शेतांमध्ये पाणी देखील साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी पावसामुळे समाधान व्यक्त केले आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्याला वेग आला आहे. अनेकांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील काही भागाला अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तेथील पेरण्या रखडल्या असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊस