शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

भोकरदन तालुक्यात दमदार एन्ट्री: तासभर झालेल्या पावसाने पाणीच पाणी

By दिपक ढोले  | Updated: July 2, 2023 19:13 IST

पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता.

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील काही भागांत रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते. या पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेल्या पेरण्याला वेग आला आहे.

यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता; परंतु पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. शिवाय, अनेक शेतकऱ्यांच्या मिरचीचे पीक पाण्याअभावी सुकून जात होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. अनेक शेतकऱ्यांनी तांब्याने मिरचीला पाणी देण्यास सुरुवात केली होती. त्यातच रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भोकरदन, पेरजापूर, आव्हाना, गोकुळ, इब्राहिमपूर, आलापूर, फत्तेपूर, मासंनपूर, चोरहाळा, विरेगाव, कुंभारी, कोदोली, टाकळी, सिपोरा बाजार, नांजा, क्षीरसागर, सुभानपूर, मनापूर, मलकापूर गावांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

जवळपास तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही शेतांमध्ये पाणी देखील साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी पावसामुळे समाधान व्यक्त केले आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्याला वेग आला आहे. अनेकांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील काही भागाला अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तेथील पेरण्या रखडल्या असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊस