शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

मंठा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आजवर तालुक्यातून एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झालेला नाही. ...

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आजवर तालुक्यातून एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झालेला नाही. ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी तगडे उमेदवार आपल्याच पॅनलमध्ये यावेत, कागदपत्रांची पूर्तता असावी, याकडे पॅनलप्रमुखांचा कल आहे. शिवाय निवडणुकीतील विजयासाठी आतापासूनच व्यूहरचना आखल्या जात आहेत.

प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. परंतु, एकाही गावातून वैयक्तिक किंवा पॅनलमधील उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी तहसील कार्यालयात इच्छुक गर्दी करीत आहेत. तर निर्माण होणाऱ्या शंकाचे निरसन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहे. सध्या गावपातळीवर कार्यकर्ते एकमेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात, भावकीची मनधरणी करण्यात आणि पॅनलची जुळवाजुळव करण्यातच मग्न आहेत. कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र असल्यामुळे कोणा- कोणाला पॅनलमध्ये घेणार ? असा प्रश्न पॅनलप्रमुखांना पडला आहे. इच्छुकांना नाराज केले तर बंडखोरी होण्याची शक्यताही अनेक ठिकाणी वर्तविली जात आहे. हे बंडखोर विरोधी गटात सामील झाले तर पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढणार आहे.

तालुक्यावर काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांची चांगली पकड आहे. त्यामुळे या निवडणुका काँग्रेस गटासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. मंठा तालुक्यात मागील पंचवार्षिकमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडल्यामुळे दोन गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. तर तीन गावांमध्ये सदस्य बिनविरोध, तर फक्त सरपंचांच्याच निवडीसाठी मतदान घेण्यात आले होते. परंतु यावेळी होऊ घातलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत यावी, यासाठी नेतेही प्रयत्न करत आहेत.

मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष

इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. हे करताना मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, मतदार यंदा कोणाला ग्रामपंचायतीत बसवितात हे १८ जानेवारी रोजी समोर येणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून अर्जांची छाननी होणार आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी इच्छूक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करुन त्यांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.