शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मंठा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आजवर तालुक्यातून एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झालेला नाही. ...

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आजवर तालुक्यातून एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झालेला नाही. ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी तगडे उमेदवार आपल्याच पॅनलमध्ये यावेत, कागदपत्रांची पूर्तता असावी, याकडे पॅनलप्रमुखांचा कल आहे. शिवाय निवडणुकीतील विजयासाठी आतापासूनच व्यूहरचना आखल्या जात आहेत.

प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. परंतु, एकाही गावातून वैयक्तिक किंवा पॅनलमधील उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी तहसील कार्यालयात इच्छुक गर्दी करीत आहेत. तर निर्माण होणाऱ्या शंकाचे निरसन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहे. सध्या गावपातळीवर कार्यकर्ते एकमेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात, भावकीची मनधरणी करण्यात आणि पॅनलची जुळवाजुळव करण्यातच मग्न आहेत. कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र असल्यामुळे कोणा- कोणाला पॅनलमध्ये घेणार ? असा प्रश्न पॅनलप्रमुखांना पडला आहे. इच्छुकांना नाराज केले तर बंडखोरी होण्याची शक्यताही अनेक ठिकाणी वर्तविली जात आहे. हे बंडखोर विरोधी गटात सामील झाले तर पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढणार आहे.

तालुक्यावर काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांची चांगली पकड आहे. त्यामुळे या निवडणुका काँग्रेस गटासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. मंठा तालुक्यात मागील पंचवार्षिकमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडल्यामुळे दोन गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. तर तीन गावांमध्ये सदस्य बिनविरोध, तर फक्त सरपंचांच्याच निवडीसाठी मतदान घेण्यात आले होते. परंतु यावेळी होऊ घातलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत यावी, यासाठी नेतेही प्रयत्न करत आहेत.

मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष

इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. हे करताना मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, मतदार यंदा कोणाला ग्रामपंचायतीत बसवितात हे १८ जानेवारी रोजी समोर येणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून अर्जांची छाननी होणार आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी इच्छूक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करुन त्यांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.