शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

जालन्यात सरळ लढतीमुळे चुरस कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 05:36 IST

जुनेच पत्ते । खोतकर-गोरंट्याल, लोणीकर-जेथलिया, टोपे-उढाण, कुचे-चौधरी आणि दानवे-दानवे अशी लढत

जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. २०१४ च्या निवडणुकीत जे प्रमुख उमेदवार होते. तेच पुन्हा मैदानात आहेत. सरळ लढती होत असल्यातरी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार किती आणि कोणाचे मते स्वत:कडे खेचतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला जालना जिल्हा आता युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. केंद्रात रावसाहेब दानवे यांच्या रुपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे तर राज्याच्या मंत्रिमंडळात बबनराव लोणीकर हे कॅबिनेट तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री म्हणून आहेत. रावसाहेब दानवे गेली साडेचार वर्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. लोकसभेत जालना जिल्ह्यातील मतदारांनी भाजपला साथ दिली. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. परंतु अशाही स्थितीत जालन्यात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल तसेच घनसावंगीत राजेश टोपे आणि परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया हे युतीच्या उमेदवारांना टक्कर देत आहेत. जालन्यातील खोतकर विरुध्द गोरंट्याल ही लढत अटीतटीची होणार असून घनसावंगीतही अशीच चुरस निर्माण झाली आहे.

परतूरमध्ये जेथलियांनी लोणीकरांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच थेट पंतप्रधान मोदी यांनाच परतूरमध्ये सभा घ्यावी लागली. या सभेचा मतांवर किती परिणाम होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.भोकरदनमध्ये संतोष दानवे विरुध्द माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होत आहे. बदनापूरमध्ये भाजपचे आ. नारायण कुचे विरुध्द राष्टÑवादीचे बबलू चौधरी लढत होत आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) नागरी समस्या आणि दुष्काळामुळे होरपळलेला बळीराजा२) जिल्ह्यातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शैक्षणिक गुणवत्ता३) सत्ताधाऱ्यांचा जिल्हा असतानाही विकासापासून कोसोदूर; विरोधकांचा आरोप४) जालन्यातील पाणीप्रश्न आणि पालिकेतील राजकारण

रंगतदार लढतीाालन्यात खोतकर विरुध्द गोरंट्याल ही सर्वाधिक रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. दोघेही जण २० वर्षांपासून कधी ना कधी एकमेकांसमोर आलेले आहेत. या निवडणुकीत खोतकरांना रावसाहेब दानवेंची साथ कशी मिळते यावर त्यांचे भवितव्य अंवलबून असल्याचे दिसते.परतूर मतदार संघात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर विरुध्द माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया ही लढत लक्षणीय ठरणार आहे. वंचितचा उमेदवार किती मते घेतो यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.घनसावंगी मतदार संघात आ. राजेश टोपे विरुध्द शिवसेनेचे हिकमत उढाण यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षीत आहे. टोपे हे १९९९ पासून या मतदार संघाचे नेतृत्व करतात. ते बारा वर्षे मंत्री म्हणून राहीले आहेत. अशाही स्थितीत टोपे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बांधकाम व्यावसायिक हिकमत उढाण यांनी स्वतंत्र रणनीती आखली आहे.