शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

जालन्यात सरळ लढतीमुळे चुरस कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 05:36 IST

जुनेच पत्ते । खोतकर-गोरंट्याल, लोणीकर-जेथलिया, टोपे-उढाण, कुचे-चौधरी आणि दानवे-दानवे अशी लढत

जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. २०१४ च्या निवडणुकीत जे प्रमुख उमेदवार होते. तेच पुन्हा मैदानात आहेत. सरळ लढती होत असल्यातरी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार किती आणि कोणाचे मते स्वत:कडे खेचतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला जालना जिल्हा आता युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. केंद्रात रावसाहेब दानवे यांच्या रुपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे तर राज्याच्या मंत्रिमंडळात बबनराव लोणीकर हे कॅबिनेट तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री म्हणून आहेत. रावसाहेब दानवे गेली साडेचार वर्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. लोकसभेत जालना जिल्ह्यातील मतदारांनी भाजपला साथ दिली. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. परंतु अशाही स्थितीत जालन्यात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल तसेच घनसावंगीत राजेश टोपे आणि परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया हे युतीच्या उमेदवारांना टक्कर देत आहेत. जालन्यातील खोतकर विरुध्द गोरंट्याल ही लढत अटीतटीची होणार असून घनसावंगीतही अशीच चुरस निर्माण झाली आहे.

परतूरमध्ये जेथलियांनी लोणीकरांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच थेट पंतप्रधान मोदी यांनाच परतूरमध्ये सभा घ्यावी लागली. या सभेचा मतांवर किती परिणाम होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.भोकरदनमध्ये संतोष दानवे विरुध्द माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होत आहे. बदनापूरमध्ये भाजपचे आ. नारायण कुचे विरुध्द राष्टÑवादीचे बबलू चौधरी लढत होत आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) नागरी समस्या आणि दुष्काळामुळे होरपळलेला बळीराजा२) जिल्ह्यातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शैक्षणिक गुणवत्ता३) सत्ताधाऱ्यांचा जिल्हा असतानाही विकासापासून कोसोदूर; विरोधकांचा आरोप४) जालन्यातील पाणीप्रश्न आणि पालिकेतील राजकारण

रंगतदार लढतीाालन्यात खोतकर विरुध्द गोरंट्याल ही सर्वाधिक रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. दोघेही जण २० वर्षांपासून कधी ना कधी एकमेकांसमोर आलेले आहेत. या निवडणुकीत खोतकरांना रावसाहेब दानवेंची साथ कशी मिळते यावर त्यांचे भवितव्य अंवलबून असल्याचे दिसते.परतूर मतदार संघात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर विरुध्द माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया ही लढत लक्षणीय ठरणार आहे. वंचितचा उमेदवार किती मते घेतो यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.घनसावंगी मतदार संघात आ. राजेश टोपे विरुध्द शिवसेनेचे हिकमत उढाण यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षीत आहे. टोपे हे १९९९ पासून या मतदार संघाचे नेतृत्व करतात. ते बारा वर्षे मंत्री म्हणून राहीले आहेत. अशाही स्थितीत टोपे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बांधकाम व्यावसायिक हिकमत उढाण यांनी स्वतंत्र रणनीती आखली आहे.