शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

निकृष्ट गव्हाचा पुरवठा थांबवा- अर्जुन खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:50 IST

गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा तसेच शहरात रेशन दुकानातून गोरगरिबांसाठी वाटप करण्यासाठी आलेला गहू हा दर्जेदार नसून, तो पावसात भिजल्याने त्या गव्हाला दुर्गंधी येत असून, तो काळा पडला आहे. यामुळे कदाचित आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही भीती लक्षात घेता या गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.जालना जिल्ह्यात जवळपास तीन हजार ५०० मेट्रीकटन गव्हाचा साठा हा सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात रेशन दुकानांतून करण्यासाठी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. दरम्यान राजूर येथील एका रेशन दुकानात गव्हामध्ये रासायनिक घटक आढळून आल्याने तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेने रास्तारोको आंदोलनही केले होते. यावेळी जालना शहर स्वस्तधान्य दुकानदार आणि केरोसीन परवाना धारक संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार पंडित, शहराध्यक्ष मंजित कक्कड, शैलेश कक्कड, संकेत पाटील, मनोज जगधने, शाम वाघमारे, फहाद चाऊस, गणेश गूल्लापेल्ली, नंदलाल कक्कड, शाम वाघमारे, दत्ता यमुल, साबेर चाऊस, रवी जयस्वाल, दीलिप जयस्वाल, श्रीकीशन येमूल, विजय मोडे, शुभम बिडकर यांची उपस्थिती होती.जालना शहरातील जवळपास ३० दुकानांवर हा साठा वितरित करण्यात आल्याचे रेशन दुकानदारांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट घेऊन सांगितले. याची गंभीर दखल घेत खोतकर यांनी जिल्हाधिकारी तसेच पुरवठा अधिकारी रिना बसय्ये यांनीही या बद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले.या संदर्भात राष्ट्रीय फुड अ‍ॅथोरेटीलाही बोलणार असून, केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याही कानावर ही बाब घालणार असल्याचे खोतकरांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरcollectorजिल्हाधिकारी