शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जागते रहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST

लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांची आढावा बैठक घेतली.यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंपालाल शेवगण, सुनील जायभाये, सोपान बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील अठरा पोलीस ठाणे प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.औरंगाबाद परिक्षेत्रात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र सिंघल यांनी जालना येथे पोलिसांची आढावा बैठक घेतली.निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा बिघडविण्याचा प्रयत्न करण्याची भीती असते.यामुळे पोलिसांनी अशा गुंडावर नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, बेकायदेशीर शस्त्र, दारुविक्री करणाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी पोलीस प्रमुखांना दिल्या.तसेच निवडणूक काळात कोणत्या गोष्टीना पहिले प्राधान्य द्यावे याविषयी सिंघल यांनी सांगितले. बीड येथे पूर्ववैमनस्यातून एका पक्षाच्या नगरसेवकाचा खून करण्यात आला आहे.अशा घटना जिल्ह्यात घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.पोलिसांचे कौतुकलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि एडीएसच्या पथकाने जुगाराचे अड्डे, दारु अड्ड्यांवर छापे मारुन अनेकांवर कारवाई केली. तिघा जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन हर्सूल कारागृहात रवानगी केली. तसेच दोघा जणांवर हद्दपारीची कारवाई केल्याने सिंघल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक केले.जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून कुठलीच विपरीत घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विपरीत घटना घडण्याची दाट शक्यता असते, यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalna Policeजालना पोलीस