शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जागते रहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST

लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांची आढावा बैठक घेतली.यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंपालाल शेवगण, सुनील जायभाये, सोपान बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील अठरा पोलीस ठाणे प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.औरंगाबाद परिक्षेत्रात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र सिंघल यांनी जालना येथे पोलिसांची आढावा बैठक घेतली.निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा बिघडविण्याचा प्रयत्न करण्याची भीती असते.यामुळे पोलिसांनी अशा गुंडावर नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, बेकायदेशीर शस्त्र, दारुविक्री करणाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी पोलीस प्रमुखांना दिल्या.तसेच निवडणूक काळात कोणत्या गोष्टीना पहिले प्राधान्य द्यावे याविषयी सिंघल यांनी सांगितले. बीड येथे पूर्ववैमनस्यातून एका पक्षाच्या नगरसेवकाचा खून करण्यात आला आहे.अशा घटना जिल्ह्यात घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.पोलिसांचे कौतुकलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि एडीएसच्या पथकाने जुगाराचे अड्डे, दारु अड्ड्यांवर छापे मारुन अनेकांवर कारवाई केली. तिघा जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन हर्सूल कारागृहात रवानगी केली. तसेच दोघा जणांवर हद्दपारीची कारवाई केल्याने सिंघल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक केले.जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून कुठलीच विपरीत घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विपरीत घटना घडण्याची दाट शक्यता असते, यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalna Policeजालना पोलीस