शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

नवनिर्माण सेनेचे अधीक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

याचवेळी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील रामेश्वर प्रभाकर शेळके यांचा ट्रॅक्टर परस्पर लांबविल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी ...

याचवेळी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील रामेश्वर प्रभाकर शेळके यांचा ट्रॅक्टर परस्पर लांबविल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी चौकशीचे आश्वासन दिले.

०००००००००००००००

भाजप ओबीसी मोर्चाची तीव्र निदर्शने

पुनर्विचार याचिका दाखल करावी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. ही बाब समाजासाठी दुर्दैवी आहे. यासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

गुरुवारी भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणासाठी कुठलीच हालचाल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकूणच याबद्दल संपूर्ण राज्यभर राज्य सरकारच्या विराेधात रोष व्यक्त केला जात आहे. याची दखल सरकारने घ्यावी यासाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, रामेश्वर भांदरगे, बद्रिनाथ पठाडे, अतीक खान, सिध्दिविनायक मुळे, धनराज काबलीये, सुहास मुंडे, सिध्देश्वर हसबे, सतीश केरकर, संतोष पवार, बद्रिनाथ वाघ, पवन झुंगे, विजय मतकर, शंकर लहामगे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी निर्दशने करून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

०००००००००००००

जिल्हाधिकाऱ्यांकडून हडप येथे पाहणी

जालना : कृषी विभागाच्यावतीने आत्मा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कंपनीची स्थापना केली आहे. त्यातून ना नफा ना तोटा या तत्त्वावर खाद्यतेलाचा प्रकल्प उभारला आहे. याअंतर्गत विविध ब्रँड त्यांनी विकसित केल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पास गुरुवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक तथा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन माद्दलवार यांची उपस्थिती होती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत, खाद्यतेलाची मागणी लक्षात घेऊन, ही शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. शेंगदाणा, करडी, मोहरी आदी तेलाची निर्मिती येथे केली जाणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देताना सांगितले.