शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

नवनिर्माण सेनेचे अधीक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

याचवेळी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील रामेश्वर प्रभाकर शेळके यांचा ट्रॅक्टर परस्पर लांबविल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी ...

याचवेळी जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील रामेश्वर प्रभाकर शेळके यांचा ट्रॅक्टर परस्पर लांबविल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी चौकशीचे आश्वासन दिले.

०००००००००००००००

भाजप ओबीसी मोर्चाची तीव्र निदर्शने

पुनर्विचार याचिका दाखल करावी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. ही बाब समाजासाठी दुर्दैवी आहे. यासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

गुरुवारी भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणासाठी कुठलीच हालचाल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकूणच याबद्दल संपूर्ण राज्यभर राज्य सरकारच्या विराेधात रोष व्यक्त केला जात आहे. याची दखल सरकारने घ्यावी यासाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, रामेश्वर भांदरगे, बद्रिनाथ पठाडे, अतीक खान, सिध्दिविनायक मुळे, धनराज काबलीये, सुहास मुंडे, सिध्देश्वर हसबे, सतीश केरकर, संतोष पवार, बद्रिनाथ वाघ, पवन झुंगे, विजय मतकर, शंकर लहामगे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी निर्दशने करून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

०००००००००००००

जिल्हाधिकाऱ्यांकडून हडप येथे पाहणी

जालना : कृषी विभागाच्यावतीने आत्मा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कंपनीची स्थापना केली आहे. त्यातून ना नफा ना तोटा या तत्त्वावर खाद्यतेलाचा प्रकल्प उभारला आहे. याअंतर्गत विविध ब्रँड त्यांनी विकसित केल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पास गुरुवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक तथा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन माद्दलवार यांची उपस्थिती होती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत, खाद्यतेलाची मागणी लक्षात घेऊन, ही शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. शेंगदाणा, करडी, मोहरी आदी तेलाची निर्मिती येथे केली जाणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देताना सांगितले.