शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

चौदा विद्यार्थ्यांवर पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:47 IST

जालन्याजवळील इंदेवाडी येथील एका विद्यालयात चक्क नऊ विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून यंदा एसएससी बोर्डाने अधिकची खबरदारी घेतीली आहे. सोमवारी भौतिक शास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. जालन्याजवळील इंदेवाडी येथील एका विद्यालयात चक्क नऊ विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्याचे प्रकार सुरू आहेत. कितीही सूचना दिल्यावरही विद्यार्थी मोठ्या हातचलाखीने कॉपी सोबत आणत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. प्रारंभी परीक्षा केंद्रावर येतानाच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अशाही स्थितीत विद्यार्थी शक्कल लढवून कॉपी परीक्षा केंद्रात आणत आहेत. सोमवारी इंदेवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात भरारी पथकाने सकाळच्या सत्रात अचानक भेट दिली. भरारी पथक आल्याचे कळल्यावर विद्यार्थ्यांची मोठी तारंबळ उडाली. प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्गात पुन्हा कडक तपासणी करण्यात आल्यावर जवळपास नऊ विद्यार्थ्यांनी पाकीट डायरी प्रमाणे गाईडची पाने झेरॉक्स करून आणल्याचे दिसून आले.प्रारंभी आमच्याकडे काहीच नाही, असे विद्यार्थ्यानी सांगितले. परंतु नंतर सर्वांचे खिसे तपासण्यात आले असता, कोणी कॉप्या या बुटाच्या मोज्यात दडवल्याचे दिसून आले. एकूणच या प्रकरणी नऊ विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर विद्यालयाप्रमाणेच सरस्वती भुवन विद्यालयातही तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना ताब्यात घेतले असून, उर्दू हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याचे माहिती अनिल भेरे आणि भारत पालवे यांनी दिली.जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयेही ग्रामीण भागात आहेत. असे असतानाच अनेक कनिष्ठ महाविद्यालयांकडे स्वत:ची विज्ञानाची लॅब नाही. त्यातच प्रात्यक्षिक परीक्षा घेताना त्या केवळ कागदोपत्री घेण्यात आल्याचे वास्तव आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेची खऱ्या अर्थाने चौकशी झाल्यास मोठे गंभीर परिणाम पुढे येणार आहेत. परंतु शिक्षण विभागात आणि संस्थाचालकांचे साटेलोटे असल्याने प्रात्यक्षिक परीक्षांकडे कोणीच गंभीरतेने पाहत नसल्याचे दिसून आले. एकूणच विद्यार्थ्यांचे नुकसान कशाला करायचे, अशी सबब सांगून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु यातून विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे.दक्षता : सहा भरारी पथकेजालना जिल्ह्यात यंदा इयत्ता बारावी परीक्षेसाठी जवळपास २९ हजार विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या लक्षात घेता सहा भरारी पथकांसह बैठी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा सुरू झाल्यापासून जवळपास १९ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय