शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

चौदा विद्यार्थ्यांवर पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:47 IST

जालन्याजवळील इंदेवाडी येथील एका विद्यालयात चक्क नऊ विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून यंदा एसएससी बोर्डाने अधिकची खबरदारी घेतीली आहे. सोमवारी भौतिक शास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. जालन्याजवळील इंदेवाडी येथील एका विद्यालयात चक्क नऊ विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्याचे प्रकार सुरू आहेत. कितीही सूचना दिल्यावरही विद्यार्थी मोठ्या हातचलाखीने कॉपी सोबत आणत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. प्रारंभी परीक्षा केंद्रावर येतानाच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अशाही स्थितीत विद्यार्थी शक्कल लढवून कॉपी परीक्षा केंद्रात आणत आहेत. सोमवारी इंदेवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात भरारी पथकाने सकाळच्या सत्रात अचानक भेट दिली. भरारी पथक आल्याचे कळल्यावर विद्यार्थ्यांची मोठी तारंबळ उडाली. प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्गात पुन्हा कडक तपासणी करण्यात आल्यावर जवळपास नऊ विद्यार्थ्यांनी पाकीट डायरी प्रमाणे गाईडची पाने झेरॉक्स करून आणल्याचे दिसून आले.प्रारंभी आमच्याकडे काहीच नाही, असे विद्यार्थ्यानी सांगितले. परंतु नंतर सर्वांचे खिसे तपासण्यात आले असता, कोणी कॉप्या या बुटाच्या मोज्यात दडवल्याचे दिसून आले. एकूणच या प्रकरणी नऊ विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर विद्यालयाप्रमाणेच सरस्वती भुवन विद्यालयातही तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना ताब्यात घेतले असून, उर्दू हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याचे माहिती अनिल भेरे आणि भारत पालवे यांनी दिली.जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयेही ग्रामीण भागात आहेत. असे असतानाच अनेक कनिष्ठ महाविद्यालयांकडे स्वत:ची विज्ञानाची लॅब नाही. त्यातच प्रात्यक्षिक परीक्षा घेताना त्या केवळ कागदोपत्री घेण्यात आल्याचे वास्तव आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेची खऱ्या अर्थाने चौकशी झाल्यास मोठे गंभीर परिणाम पुढे येणार आहेत. परंतु शिक्षण विभागात आणि संस्थाचालकांचे साटेलोटे असल्याने प्रात्यक्षिक परीक्षांकडे कोणीच गंभीरतेने पाहत नसल्याचे दिसून आले. एकूणच विद्यार्थ्यांचे नुकसान कशाला करायचे, अशी सबब सांगून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु यातून विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे.दक्षता : सहा भरारी पथकेजालना जिल्ह्यात यंदा इयत्ता बारावी परीक्षेसाठी जवळपास २९ हजार विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या लक्षात घेता सहा भरारी पथकांसह बैठी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा सुरू झाल्यापासून जवळपास १९ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय