शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रशासकीय कामकाजाला देणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:32 IST

जिल्ह्याच्या विकासासंबंधी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय कामांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

बाबासाहेब म्हस्के/जालना : जिल्ह्याच्या विकासासंबंधी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय कामांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. त्यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मुलाखतीत विविध मुद्द््यांवर आपली भूमिका मते मांडली.मूळ दिल्लीच्या असलेल्या अरोरा भारतीय प्रशासन सेवेतील २०१४ बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी संगणकशास्त्रात बी. टेक. पूर्ण केले असून लोकप्रशासन विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. सध्या त्या एल.एल.एम.च्या द्वितीय वर्षाचे शिक्षणही घेत आहेत. त्यांनी या पूर्वी दिल्ली येथे मंत्रालयामध्ये मानव संसाधन आणि विकास या विभागात काम केले आहे. जालन्यात रुजू होण्यापूर्वी त्या नंदूरबार येथे साहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होत्या. मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून हा पहिलाच पदभार आहे. जिल्हा परिषदेच्या कामाचा अनुभव आपल्यासाठी नवीन असला तरी सध्या सुरू असलेली कामे विविध विभागातील अधिका-यांच्या समन्वयाने अधिक चांगल्या पद्धतीने, कशी करता येईल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.अरोरा म्हणाल्या, प्रशासकीय कामकाजांचा जलद गतीने निपटारा करण्यास प्राधान्य देऊन प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी विभागनिहाय बैठक घेणार आहोत. त्याचबरोबर आगामी काळात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी जिल्ह्यात काही नवीन संकल्पना राबवता येतील, का याचाही विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, मंगळवारी सकाळी पदभार घेतल्यानंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, जि.प. सदस्य जयमलंग जाधव, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे आदींनी त्यांचे स्वागत केले.----------रिक्त पदांचे आव्हान....जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, सिंचन इ. सर्वच विभागांमध्ये सध्या वर्ग एकपासून वर्ग चारपर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी रिक्त पदे भरणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांना वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे. शिवाय जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. राजकीय स्थितीला कौशल्याने हाताळण्याचे आव्हान नूतन मुख्य कार्यकारी अधिकाºयांसमोर आहे.--------------आरोग्य विभागाच्या कामाचा आढावापदभार स्वीकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा परिषद सभागृहात आरोग्य विभागातील अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली. आरोग्य सुविधा ही आवश्यक सुविधा असल्याने प्रत्येकाने चांगले काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राष्ट्रीय जंत नाशक कार्यक्रमाची त्यांनी माहिती घेतली. तसेच विभागातील कर्मचा-यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे रावसाहेब शेळके यांची या वेळी उपस्थिती होती.