शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

सोयाबीन उगवेना, युरियाची टंचाई; हिरवी स्वप्न भंगण्याची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 20:05 IST

पेरणी केलेल्या पिकांना आता वाढीसाठी पावसाची गरज आहे. 

ठळक मुद्देबळीराजाचे डोळे आभाळाकडे  शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जालना :  जालना जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस जोरदार झाला तसेच मृग नक्षत्राने देखील प्रारंभी चांगली हजेरी लावून शेतकºयांचा उत्साह वाढविला होता. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांची हिरवी  स्वप्न भंगण्याची भीती निर्माण झाली असून, जिल्ह्यात मंगळवार पर्यंत जवळपास ६० टक्के पेरणी उरकली असून, आता पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाचे क्षेत्र हे एकूण पाच लाख ७० हजार हेक्टर आहे. त्यात सोयाबीन, कपाशी, तूर आदींची मोठ्या प्रमाणावर पेरणी शेतकºयांनी सुरूवातीच्या पावसातच केली. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असून, त्यानुसार त्याचा श्रीगणेशाही झाला होता. गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस, नंतर अवकाळीचा फटका यामुळे खरीप आणि रबी हंगाम असे दोन्ही शेतकºयांच्या हातातून गेले होते. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडून पिके चांगली येतील या आशेवर शेतक-यांनी कडक उन्हाची तमा न बाळगता शेतं पेरण्यासाठी तयार करून ठेवली होती. 

पूर्वमोसमी पाऊस आणि नंतर मृगाच्या सरींनी जोरदार हजेरी लावली. काहींच्या शेतात पाणी घुसल्याने केलेली पेरणी वाहून गेली. तर काही भागात समाधानकार पाऊस पडून बियाणांनी जमनितून डोके वर काढले होते. त्यामुळे शेतात शेतक-यांना पुन्हा नवीन उमेद दिसत होती. परंतु गेल्या आठ दिवसां पासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खºया अर्थान यंदा जून महिन्यात चांगला पाऊस झाला असून, जूनची सरासरी देखील पावसाने ओलांडली आहे. असे असतांनाच नंतर कडक उन पडल्याने तापमानात वाढ होऊन जमिनितील ओल सुकली आहे. यामुळे पेरणी केलेल्या पिकांना आता वाढीसाठी पावसाची गरज आहे. 

क्षमता तपासलीजिल्ह्यात यंदा कृषी विभागाने यंदा खरीपाची तयारी करण्यासाठी कंबर कसली होती. मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड होणार हे माहित असल्याने शेतकºयांनी त्यांच्या घरात असलेली बियाणे वापरण्यावर भर दिला आहे. या घरातील बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी जवळपास एक हजार गावांमध्ये विशेष उपक्रम कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी राविला. त्याचे रिपोर्ट चांगले असून, जवळपास ६० टक्के बियाणांची उगवण क्षमता ही चांगली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान काही खाजगी कंपन्या आणि महाबीजच्या बियाणांची उगवन क्षमता चांगली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती हाती आली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीJalanaजालना