शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

दीड एकरातील सोयाबीन पिक उपटून टाकले, खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यास अश्रू अनावर

By दिपक ढोले  | Updated: August 31, 2022 14:48 IST

सोयाबीन ऐन फुलोऱ्यात आली अन् पिवळी पडू लागली.

हिसोडा (जालना) : पिवळ्या पडलेल्या सोयाबीनला शेंगा येत नसल्याने भोकरदन तालुक्यातील लेहा शिवारातील एका शेतकऱ्याने बुधवारी दीड एकरातील सोयाबीन उपटून टाकली आहे. पेरणीवर झालेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे.

लेहा शिवारातील गट नंबर ३४२ मध्ये शेख ऐजाज शेख रजाक यांची चार एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी व एक मुलगी आहे. उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच होतो. यंदा जुलै महिन्यांत पाऊस पडल्याने त्यांनी दीड एकरात सोयाबीन पेरली. जुलै महिन्यांत सतत पाऊस पडत राहिला. त्यामुळे पीकही चांगले आले.

सोयाबीन ऐन फुलोऱ्यात आली अन् पिवळी पडू लागली. त्यांनी महागडी औषधी खरेदी करून फवारणी केली. परंतु, तरीही काहीच फायदा झाला नाही. सोयाबीनला ना फुलोरा येत, ना शेंगा त्यामुळे त्यांनी सोयाबीन उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. शेवटी बुधवारी सकाळी त्यांनी सोयाबीन उपटून टाकली. झालेला खर्चही निघाला नसल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती