शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

सौमित्र यांना दु:खी राज्य काव्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:12 IST

दु:खी राज्य काव्य पुरस्कार सौमित्र यांना कृषिभूषण विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात प्रदान करण्यात आला.

जालना : वाढत्या वयानुसार कविता सुध्दा बदलायला हवी. वयाने मोठे होऊ तितके कवितेच्या जवळ जाता यावे हेच आपण करत आलो आहोत. कवितेतून अनुभवाच्या कोंबापर्यंत जाण्याचा प्रयत्न सदैव सुरु आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, नट (सौमित्र) किशोर कदम यांनी केले. स्व.राय हरीश्चंद्र साहनी -दु:खी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा दु:खी राज्य काव्य पुरस्कार सौमित्र यांना कृषिभूषण विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना किशोर कदम म्हणाले की, तारुण्यात लिहीलेला ‘गारवा’ ही कोवळ्या वयातील भावना वाचक आजही सोडत नाही. १५ वर्षानंतर दुसरा काव्य संग्रह आला दु:खी पुरस्कार २० व्या वर्षी मिळत असल्याने पाडवा आणि गारवा दोघेही तरुण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. धकाधकीच्या जीवनात आयुष्य समजावून घेता आले पाहिजे. वाढत्या वया सोबत समज येते असे मानले जाते, परंतु समज आल्यावर त्याचे प्रत्यक्ष जीवनात प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे. आज आपण गारवा प्रमाणेच अनेक कवीता संग्रह लिहिल्याचेही किशोर कदम म्हणाले.हा राज्य काव्य पुरस्कार मला मिळाल्याचा मोठा आंनद आणि समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले. जालन्यातील रसिकांच्या उपस्थिती बद्दलही त्यांनी कौतुक केले. पुरस्काराचे स्वरूप रोख २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह असे आहे. प्रारंभी स्व. नंदकिशोर साहनी ट्रस्टचे अध्यक्ष विनीत साहनी यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी या कार्यक्रमाचे साहित्य विश्वातील महत्व विशद केले.सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. तर पंडित तडेगावकर यांनी आभार मानले. यावेळी साहनी परिवारातील सदस्यांसह शहरातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी चित्रकार ज्ञानेश्वर गिराम, प्राध्यापक विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक, संजीवनी डहाळे, गजेंद्र पळसकर, यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरणानंतर विजय चौरमारे, आबा पाटील, भारत दौडंकर, बालाजी सुतार, शोभा रोकडे यांचे कवी संमेलन पार पडले.रुपेरी पडदा व काव्यांतून समाज परिवर्तन व्हावे- बोराडेशेती आणि माती वातावरण व समाजातील बदलत्या हवामानामुळे बदलले आहे. गावखेड्यातील गोडवा दुरावला असून राजकारण आणि प्रबोधन या दोन्ही क्षेत्राकडून हे बदलणे अशक्य आहे. अशा स्थितीत रुपेरी पडदा आणि काव्यांतून समाज परिवर्तन होईल अशी अपेक्षा कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Kishore kadamकिशोर कदमliteratureसाहित्य