शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सौमित्र यांना दु:खी राज्य काव्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:12 IST

दु:खी राज्य काव्य पुरस्कार सौमित्र यांना कृषिभूषण विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात प्रदान करण्यात आला.

जालना : वाढत्या वयानुसार कविता सुध्दा बदलायला हवी. वयाने मोठे होऊ तितके कवितेच्या जवळ जाता यावे हेच आपण करत आलो आहोत. कवितेतून अनुभवाच्या कोंबापर्यंत जाण्याचा प्रयत्न सदैव सुरु आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, नट (सौमित्र) किशोर कदम यांनी केले. स्व.राय हरीश्चंद्र साहनी -दु:खी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा दु:खी राज्य काव्य पुरस्कार सौमित्र यांना कृषिभूषण विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना किशोर कदम म्हणाले की, तारुण्यात लिहीलेला ‘गारवा’ ही कोवळ्या वयातील भावना वाचक आजही सोडत नाही. १५ वर्षानंतर दुसरा काव्य संग्रह आला दु:खी पुरस्कार २० व्या वर्षी मिळत असल्याने पाडवा आणि गारवा दोघेही तरुण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. धकाधकीच्या जीवनात आयुष्य समजावून घेता आले पाहिजे. वाढत्या वया सोबत समज येते असे मानले जाते, परंतु समज आल्यावर त्याचे प्रत्यक्ष जीवनात प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे. आज आपण गारवा प्रमाणेच अनेक कवीता संग्रह लिहिल्याचेही किशोर कदम म्हणाले.हा राज्य काव्य पुरस्कार मला मिळाल्याचा मोठा आंनद आणि समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले. जालन्यातील रसिकांच्या उपस्थिती बद्दलही त्यांनी कौतुक केले. पुरस्काराचे स्वरूप रोख २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह असे आहे. प्रारंभी स्व. नंदकिशोर साहनी ट्रस्टचे अध्यक्ष विनीत साहनी यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी या कार्यक्रमाचे साहित्य विश्वातील महत्व विशद केले.सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. तर पंडित तडेगावकर यांनी आभार मानले. यावेळी साहनी परिवारातील सदस्यांसह शहरातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी चित्रकार ज्ञानेश्वर गिराम, प्राध्यापक विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक, संजीवनी डहाळे, गजेंद्र पळसकर, यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरणानंतर विजय चौरमारे, आबा पाटील, भारत दौडंकर, बालाजी सुतार, शोभा रोकडे यांचे कवी संमेलन पार पडले.रुपेरी पडदा व काव्यांतून समाज परिवर्तन व्हावे- बोराडेशेती आणि माती वातावरण व समाजातील बदलत्या हवामानामुळे बदलले आहे. गावखेड्यातील गोडवा दुरावला असून राजकारण आणि प्रबोधन या दोन्ही क्षेत्राकडून हे बदलणे अशक्य आहे. अशा स्थितीत रुपेरी पडदा आणि काव्यांतून समाज परिवर्तन होईल अशी अपेक्षा कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Kishore kadamकिशोर कदमliteratureसाहित्य