शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

घनकचऱ्याचा प्रश्न सुटणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:42 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरविकास विभागाने १६ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, सामनगाव येथील रखडलेला घनकचरा प्रकल्पही कार्यान्वित होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरविकास विभागाने १६ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, सामनगाव येथील रखडलेला घनकचरा प्रकल्पही कार्यान्वित होणार आहे.प्रत्येक शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. जालना शहरात सध्या दररोज १०५ टन कचरा निघतो. कच-याचे घरोघरी जाऊन संकलन करण्यासाठी आवश्यक यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नसल्याने काही कामे खाजगी एजन्सीमार्फत करावी लागतात. शिवाय २००८-०९ मध्ये सामनगाव येथे पथदर्शी म्हणून सुरू करण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाचे कामही रखडले आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासह शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत नगरविकास विभागाने जालना शहरासाठी १६ कोटी, ५२ लाख ३९ हजारांच्या नागरी घनकचरा व्यवस्थाप प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. केंद्र व राज्यशासनाकडून मिळणा-या निधीबरोबर नगरपालिकेलाही यात लोकवाटा भरावा लागणार आहे. प्राप्त निधीतून ३३ नवीन घंटागाड्या, दोन डंम्परप्रेसर, लोडर, कॉम्पॅक्टर आदी वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्व खरेदी शासनाच्या ‘गव्हर्नमेंट मार्केटप्लेस पोर्टल’ वरूनच करावी लागणार आहे. ओल्या व सुक्या कचºयावरील प्रक्रियेसाठी सामनगाव येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. या सर्व कामांचा सविस्तर अहवाल पालिकेला नगरविकास विभागास वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. येत्या पाच महिन्यात घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी माहिती नगरपालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी दिली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नState Governmentराज्य सरकार