शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन राबवणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:57 IST

घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली असून, यासाठी प्रशासनाने बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला आहे.

जालना : गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली असून, यासाठी प्रशासनाने बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पाला यश मिळाले असून, पहिल्या टप्प्यात बदनापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.स्वच्छेतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन देशभरात राबविले. याला देशवासियांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंतु, ग्रामीण भागात अद्यापही म्हणावी, तशी स्वच्छेतेबाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळे आजही गावांमध्ये कचरा रस्त्यावरच पडलेला दिसत आहे. या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.रासायनिक खतांचा वापर टाळून जास्तीत- जास्त सेंद्रीय खतांचा वापर व्हावा व गावात होणा-या कच-याचे रूपांतर सेंद्रीय खतात व्हावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांनी हा प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. गुजरातमधील नेपरा कंपनीच्या मदतीने बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला. येथे या प्रयोगाला यश आले असून, पहिल्या टप्प्यात बदनापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बदनापूर तालुक्यात यशस्वी झाल्यानंतर जिल्हाभरातील सर्व गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येईल. यासाठी १५० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला ७ लाख, ३०० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला १२ लाख, ५०० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला १५ लाख व ५०० पेक्षा जास्त कुटुंबे असलेल्या ग्रामपंचायतीला २० लाख रुपये दिले जाणार असल्याचे स्वच्छ भारत मिशनच्यावतीने सांगण्यात आले.तसेच महिलांनी तयार केलेल्या खताला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.दरम्यान, हा प्रकल्प बदनापूर तालुक्यात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येत असून, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींना निधी देखील देण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी नेमण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.अजैविक कच-याचे करणार संकलनग्रामीण भागात पडलेल्या प्लास्टिक, रबर यासारख्या अजैविक कच-याचे संकलन करण्यात येणार आहे. हा संकलीत केलेला कचरा बदनापूर येथील पंचायत समिती परिसरात आणून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर जमा झालेला कचरा खाजगी कंपनींना विकण्यात येणार असल्याचेही सीईओ अरोरा यांनी सांगितले.महिला बचत गटांना प्रशिक्षणहा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी ही महिला बचत गटांवर दिली आहे. यासाठी प्रत्येक गावातील चांगल काम करणा-या बचत गटाची निवड करण्यात आली आहे. या महिलांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना आपल्या गावात हा प्रकल्प राबवायचा आहे. बदनापूर तालुक्यातील महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले असून, लवकरच प्रकल्प राबविण्यास सुरूवात होणार आहे. तसेच इतर तालुक्यातील महिलांनाही लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नWomenमहिलाJalna z pजालना जिल्हा परिषद