शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:32 IST

सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून महामार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे

सय्यद इरफान ।लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून महामार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. चालू वर्षात आजवर या महामार्गावर ३७ अपघात झाले असून, यात २१ जणांचा बळी गेला आहे.चालू वर्षात या राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुक्याच्या २५ किलोमीटर हद्दीत ३७ अपघात झाले आहेत. या अपघातात २१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येकांना गंभीर दुखापतीमुळे जायबंदी व्हावे लागले आहे. शहागड (ता.अंबड) मधून जाणारा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, या महामार्गावर वावरणाऱ्या वाहन चालक तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येडशी - औरंगाबाद क्र. ५२ या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार होत असून, या महामार्गावरून मुंग्यांप्रमाणे वाहनांची वाहतूक सुरू असते. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असल्याने या महामार्गावर गतिरोधक कुठेच टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाºया वाहनांची संख्या अधिक आहे. त्या मानाने या महामार्गावरील अपघाताच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात शहागड ते डोणगाव फाटा (ता.अंबड) या २५ किलोमीटर अंतरात ३७ भीषण अपघात होऊन २१ जणांचे बळी गेले आहेत. किरकोळ व गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याची माहिती गोपनीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे यांनी दिली.या महामार्गावरील उड्डाणपुलावर, उड्डाणपुलाच्या पायथ्याशी, पैठण फाटा, डोणगाव फाटा इ. ठिकाणी हे अपघात झालेले आहेत. दरम्यान आठवडाभरापूर्वी शहागडच्या उड्डाणपुलावर एका मुकादमाला ट्रकने चिरडले, तीन दिवसांपूर्वी शहागडला एका टोयोटा गाडीने बैलगाडी फरफटत नेली होती. असे अनेक अपघात हे नित्याचेच आहेत.जखमींना मिळते अनेकांची मदतशहागडसह परिसरात राष्ट्रीय महामार्गावर कुठेही अपघात झाला, तर मदत कार्यासाठी अनेक व्यावसायिक धावतात. मुक्तार तांबोळी, लक्ष्मण धोत्रे, कदीर तांबोळी, विनायक शिंदे, अशफाक शहा, विनायक मचे, सिराज काझी, इमतियाज मनियार यांच्यासह इतर अनेक युवक जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत करतात. शिवाय हातात काठी घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करतात. रूग्ण वाहिका बोलाविणे, जखमींवर उपचार होईपर्यंत रूग्णालयात थांबणे, अपघातातील मृतांच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना मदत करण्याचे काम हे युवक सातत्याने करतात.कारवाई व्हावीसोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे सुसाट वाहन चालकांविरूध्द कारवाई होण्यास मदत होणार आहे. शिवाय संबंधित प्रशासनानेही सातत्याने कारवाईचे सत्र राबविणे गरजेचे असल्याचे उपसभापती बाळासाहेब नरवडे यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातNational Highwayराष्ट्रीय महामार्ग