शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:32 IST

सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून महामार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे

सय्यद इरफान ।लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून महामार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. चालू वर्षात आजवर या महामार्गावर ३७ अपघात झाले असून, यात २१ जणांचा बळी गेला आहे.चालू वर्षात या राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुक्याच्या २५ किलोमीटर हद्दीत ३७ अपघात झाले आहेत. या अपघातात २१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येकांना गंभीर दुखापतीमुळे जायबंदी व्हावे लागले आहे. शहागड (ता.अंबड) मधून जाणारा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, या महामार्गावर वावरणाऱ्या वाहन चालक तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येडशी - औरंगाबाद क्र. ५२ या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार होत असून, या महामार्गावरून मुंग्यांप्रमाणे वाहनांची वाहतूक सुरू असते. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असल्याने या महामार्गावर गतिरोधक कुठेच टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाºया वाहनांची संख्या अधिक आहे. त्या मानाने या महामार्गावरील अपघाताच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात शहागड ते डोणगाव फाटा (ता.अंबड) या २५ किलोमीटर अंतरात ३७ भीषण अपघात होऊन २१ जणांचे बळी गेले आहेत. किरकोळ व गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याची माहिती गोपनीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे यांनी दिली.या महामार्गावरील उड्डाणपुलावर, उड्डाणपुलाच्या पायथ्याशी, पैठण फाटा, डोणगाव फाटा इ. ठिकाणी हे अपघात झालेले आहेत. दरम्यान आठवडाभरापूर्वी शहागडच्या उड्डाणपुलावर एका मुकादमाला ट्रकने चिरडले, तीन दिवसांपूर्वी शहागडला एका टोयोटा गाडीने बैलगाडी फरफटत नेली होती. असे अनेक अपघात हे नित्याचेच आहेत.जखमींना मिळते अनेकांची मदतशहागडसह परिसरात राष्ट्रीय महामार्गावर कुठेही अपघात झाला, तर मदत कार्यासाठी अनेक व्यावसायिक धावतात. मुक्तार तांबोळी, लक्ष्मण धोत्रे, कदीर तांबोळी, विनायक शिंदे, अशफाक शहा, विनायक मचे, सिराज काझी, इमतियाज मनियार यांच्यासह इतर अनेक युवक जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत करतात. शिवाय हातात काठी घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करतात. रूग्ण वाहिका बोलाविणे, जखमींवर उपचार होईपर्यंत रूग्णालयात थांबणे, अपघातातील मृतांच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना मदत करण्याचे काम हे युवक सातत्याने करतात.कारवाई व्हावीसोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे सुसाट वाहन चालकांविरूध्द कारवाई होण्यास मदत होणार आहे. शिवाय संबंधित प्रशासनानेही सातत्याने कारवाईचे सत्र राबविणे गरजेचे असल्याचे उपसभापती बाळासाहेब नरवडे यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातNational Highwayराष्ट्रीय महामार्ग