शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

..तर लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

देऊळगाव राजा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत धनगर समाजासाठी ३.५ टक्क्याच्या प्रमाणात जागा न ...

देऊळगाव राजा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत धनगर समाजासाठी ३.५ टक्क्याच्या प्रमाणात जागा न देऊन शासनाने अन्याय केला आहे. या परीक्षेत समाजाला न्याय मिळाला नाही तर परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिला.

देऊळगाव राजा येथे आयोजित बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धनगर समाजाला ३.५ टक्क्यांच्या प्रमाणात जागा मिळाव्यात यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रामदास गुरव, सुनील मतकर, अक्षय गाटोळे, विशाल गाटोळे, भरत आटोळे, गजानन जोशी, चौरे, गोरे, सावळे व इतरांची उपस्थिती होती.

धनगर समाज आरक्षण, समाजाचे प्रश्न, समस्यांकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ राजकारणासाठी व स्वार्थासाठी समाजाचा समाजातील काही लोक व राजकीय पक्ष केवळ निवडणुकीपुरता वापर करत आहेत. समाजाच्या मूळ प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका आल्या की धनगर समाजाला प्रलोभने देऊन राजकीय सत्ता मिळवतात. मात्र निवडणुका संपल्या की त्यांना धनगर समाजाच्या प्रश्नांचा विसर पडतो. धनगर समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धनगर ऐक्य परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही डॉ. शशिकांत तरंगे यांनी सांगितले.

फोटो