शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यातील सहा शाळांना लागणार टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:50 IST

दहापेक्षा कमी पटसंख्या आणि कमी दर्जा असलेल्या शाळांना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सहा शाळांना फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहापेक्षा कमी पटसंख्या आणि कमी दर्जा असलेल्या शाळांना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सहा शाळांना फटका बसला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली असून, सहा शाळांना कायमस्वरूपी टाळे लागणार आहे. या शाळातील ३२ विद्यार्थ्यांचे दुसरीकडे समायोजन केले जाणार आहे.साक्षरता वाढ, शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता वाढीचे आव्हान असताना राज्य शासनाने कमी पटसंख्या आणि खालचा दर्जा मिळालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यातील १,३१४ शाळा पहिल्या टप्प्यात बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात एकूण १,५७७ शाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबतचे पत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागास प्राप्त झाले आहे. त्यानुसार मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वसंनगर-माळेगाव, जि. प. शाळा पाडळी झोपडपट्टी, प्राथमिक शाळा अंभोरा शेळके या अनुक्रमे चार, नऊ आणि सात विद्यार्थी असणा-या तीन शाळा बंद होणार आहेत. परतूर तालुक्यातील मुळेवस्ती भागातील शून्य पटसंख्येची, बदनापूर तालुक्यातील शिवाची वाडी येथील दहा पटसंख्या असलेली, तसेच अंबड तालुक्यातील हसनापूरमधील पुंडलिकनगर येथील शून्य पटसंख्या असलेली शाळा बंद होणार आहे. बंद होणा-या सहा शाळांमधील ३२ विद्यार्थ्यांचे एक किलोमीटर परिसरातल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच बंद होणा-या शाळांमध्ये कार्यरत १२ शिक्षकांचे इतरत्र समायोजन करण्यात येणार आहे.