शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

लांडग्याच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:16 IST

भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील शेतकरी नारायण महिपत गावंडे यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला करून सहा शेळ्यांचा फडशा पाडला.

धावडा : भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील शेतकरी नारायण महिपत गावंडे यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला करून सहा शेळ्यांचा फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.या घटनेची माहिती गावंडे यांनी तात्काळ महसूल तसेच वन विभागाला दिली. माहिती मिळाल्यावर वनपाल तसेच तलाठ्यांनी शनिवारी गावंडे यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या. परंतु, शनिवारी सकाळी उठल्यावर नारायण गावंडे यांचा मुलगा अंबादास गावंडे शेतात गेला असता, त्याला शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या.घटनेची माहिती मिळताच वनपाल संतोष दोडके, वनरक्षक दिलीप जाधव युवराज बोराडे तसेच तलाठी एन. ए. काळवाघे यांनी घटनेचा पंचनामा करुण पायाचे ठसे ट्रेस पेपरवर घेतले असता ते लांडग्याचे असल्याचे स्पष्ट झाले.लांडग्याने शेळ्या फस्त केल्याने शेतकरी गावंडे यांचे जवळपास ५० हजारपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये या भागात लांडगे, रानडुकर तसेच अन्य हिंस्त्र प्राणी हे पाण्यासह अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे सांगण्यात आले. गावंडे यांच्या गोठ्यातील शेळ्यांवरील हल्ला देखील अशाच पध्दतीतून झाला असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.वन्य प्राण्यांच्या या वाढत्या वावरामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वन विभागाच्यावतीने हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पशुपालकांना आर्थिक मदत देण्याचे निकष असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी