शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब...अवकाळीने सर्वच हिरावले; केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:45 IST

पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली.

ठळक मुद्देएकरी २० हजाराची मागणी 

जालना : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आमचे मोठे नुकसान झाले असून आता शिल्लक कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळण  अवघड झाले आहे. रबी पेरणीही आता शक्य नसल्याने आम्हाला एकरी किमान २० हजाराची मदत मिळावी, अशी मागणी जालना तालुक्यातील दरेगाव येथील महिला शेतकरी शांताबाई शेळके, कैलास ढवळे या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांकडे  केली. 

पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली. तर गवळी पोखरी शिवारातील द्राक्ष बागांचीही पथकाने पाहणी केली.  या पथकाने कडेगाव, चांदई एक्को, अकोलादेव येथेही भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. पथकाचे  प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल  व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, उपायुक्त सदानंद टाकसाळे, विभागीय सहसंचालक कृषी साहेबराव दिवेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके,  तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका  कृषी अधिकारी  सुखदेव  उपस्थित होते. 

यावेळी  दरेगाव येथील मका उत्पादक शेतकरी कैलास ढवळे यांच्या शेतात मका तसाच पडून होता. आता तुम्ही रबीची पेरणी करणार काय, यावर शेतकऱ्यांनी आता वेळ निघून गेल्याचे सांगून आता हे शक्य नसल्याचे सांगितले. दरेगाव येथील शांताबाई शेळके यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. शेतात जाताना आजही पाण्याचा वापसा न  झाल्याने अधिकाऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागला. यावेळी दीड एकर कापूस आम्ही लावला  होता, असे सांगून यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे सांगितले.  गवळी पोखरी शिवारातील  दीपक गंडाळ यांच्या द्राक्ष बागेत  मोठे विदारक चित्र त्यांना दिसून आले. यावेळी गवळी पोखरी गावात न जाता रस्त्यावरील शिवारातच अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा थांबून त्यांनी अवघ्या दहा मिनिटातच एक, दोन प्रश्नोत्तर विचारून पथक सुसाट निघून गेले. यावेळी गवळी पोखरीचे सरपंच गणेश वाघमारे, रवी कायंदे,  विधाते व शेतकरी नाराज झाले होते.

कापूस वेचणीला मजूर मिळेनाकापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याची बाबही पथकाच्या लक्षात आणून देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी दिवेकर हे शेतकऱ्यांना मराठीतून प्रश्न विचारून नंतर ते पथकातील अधिकाऱ्यांना इंग्रजीतून भाषांतर करून सांगत होते. पीकविमा काढला आहे काय असा सवालही यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसून आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार