शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

साहेब...अवकाळीने सर्वच हिरावले; केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:45 IST

पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली.

ठळक मुद्देएकरी २० हजाराची मागणी 

जालना : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आमचे मोठे नुकसान झाले असून आता शिल्लक कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळण  अवघड झाले आहे. रबी पेरणीही आता शक्य नसल्याने आम्हाला एकरी किमान २० हजाराची मदत मिळावी, अशी मागणी जालना तालुक्यातील दरेगाव येथील महिला शेतकरी शांताबाई शेळके, कैलास ढवळे या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांकडे  केली. 

पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली. तर गवळी पोखरी शिवारातील द्राक्ष बागांचीही पथकाने पाहणी केली.  या पथकाने कडेगाव, चांदई एक्को, अकोलादेव येथेही भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. पथकाचे  प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल  व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, उपायुक्त सदानंद टाकसाळे, विभागीय सहसंचालक कृषी साहेबराव दिवेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके,  तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका  कृषी अधिकारी  सुखदेव  उपस्थित होते. 

यावेळी  दरेगाव येथील मका उत्पादक शेतकरी कैलास ढवळे यांच्या शेतात मका तसाच पडून होता. आता तुम्ही रबीची पेरणी करणार काय, यावर शेतकऱ्यांनी आता वेळ निघून गेल्याचे सांगून आता हे शक्य नसल्याचे सांगितले. दरेगाव येथील शांताबाई शेळके यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. शेतात जाताना आजही पाण्याचा वापसा न  झाल्याने अधिकाऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागला. यावेळी दीड एकर कापूस आम्ही लावला  होता, असे सांगून यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे सांगितले.  गवळी पोखरी शिवारातील  दीपक गंडाळ यांच्या द्राक्ष बागेत  मोठे विदारक चित्र त्यांना दिसून आले. यावेळी गवळी पोखरी गावात न जाता रस्त्यावरील शिवारातच अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा थांबून त्यांनी अवघ्या दहा मिनिटातच एक, दोन प्रश्नोत्तर विचारून पथक सुसाट निघून गेले. यावेळी गवळी पोखरीचे सरपंच गणेश वाघमारे, रवी कायंदे,  विधाते व शेतकरी नाराज झाले होते.

कापूस वेचणीला मजूर मिळेनाकापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याची बाबही पथकाच्या लक्षात आणून देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी दिवेकर हे शेतकऱ्यांना मराठीतून प्रश्न विचारून नंतर ते पथकातील अधिकाऱ्यांना इंग्रजीतून भाषांतर करून सांगत होते. पीकविमा काढला आहे काय असा सवालही यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसून आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार