शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेती ठरेल वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:37 IST

कमी पाण्यावर व कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्यासह रोजगाराची क्षमता असलेल्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित आहे. कमी पाण्यावर व कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्यासह रोजगाराची क्षमता असलेल्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन केंद्रीय अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.जालना येथील जुना मोंढा परिसरात रेशीम दिन कार्यक्रम तसेच रेशीम कोष इमारत बांधकाम भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. शिवाजी कर्डिले, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्योती ठाकरे, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, भरत गव्हाणे, बाबा मोरे, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत आदींची प्रमुख उपस्थिती होती.दानवे म्हणाले, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकविध योजना राबवित आहे. शेतक-यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शेतक-यांनी गटशेतीला प्राधान्य देण्याची गरज आहे. फळपिकापेक्षा कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा रेशीम उद्योग असून, अधिकाधिक शेतक-यांनी या व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांनी मार्गदर्शन केले. रेशीम उद्योगामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या २८ शेतक-यांचा तसेच रेशीम संचालनालयातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचा-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शहरासह जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रेशीमशेती शेतक-यांसाठी वरदान ठरत आहे. चॉकी (रेशीमअळी) विकत घेण्यासाठी शेतक-यांना एक हजार रुपयांचे अनुदान देण्याबरोबरच कोष विक्रीसाठी शेतक-यांना प्रतिकिलो ५० रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली.तसेच मराठवाड्यामध्ये रेशीम विकासाला गती देण्यासाठी स्वतंत्र उपसंचालक कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून रेशीम उद्योग करणा-या शेतक-यांना ३ लाख रुपयांपर्यंत अनुदान शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.रेशीम कोष विक्रीचा प्रश्नही आता या रेशीम विक्री खरेदी केंद्राच्या माध्यमातून सुटला आहे. येणा-या काळात रेशीम धाग्यापासून कापड निर्मितीचा उद्योग जालन्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही खोतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRaosaheb Danweरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरMarketबाजारFarmerशेतकरी