शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेती ठरेल वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:37 IST

कमी पाण्यावर व कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्यासह रोजगाराची क्षमता असलेल्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित आहे. कमी पाण्यावर व कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्यासह रोजगाराची क्षमता असलेल्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन केंद्रीय अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.जालना येथील जुना मोंढा परिसरात रेशीम दिन कार्यक्रम तसेच रेशीम कोष इमारत बांधकाम भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. शिवाजी कर्डिले, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्योती ठाकरे, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, भरत गव्हाणे, बाबा मोरे, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत आदींची प्रमुख उपस्थिती होती.दानवे म्हणाले, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकविध योजना राबवित आहे. शेतक-यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शेतक-यांनी गटशेतीला प्राधान्य देण्याची गरज आहे. फळपिकापेक्षा कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा रेशीम उद्योग असून, अधिकाधिक शेतक-यांनी या व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांनी मार्गदर्शन केले. रेशीम उद्योगामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या २८ शेतक-यांचा तसेच रेशीम संचालनालयातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचा-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शहरासह जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रेशीमशेती शेतक-यांसाठी वरदान ठरत आहे. चॉकी (रेशीमअळी) विकत घेण्यासाठी शेतक-यांना एक हजार रुपयांचे अनुदान देण्याबरोबरच कोष विक्रीसाठी शेतक-यांना प्रतिकिलो ५० रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली.तसेच मराठवाड्यामध्ये रेशीम विकासाला गती देण्यासाठी स्वतंत्र उपसंचालक कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून रेशीम उद्योग करणा-या शेतक-यांना ३ लाख रुपयांपर्यंत अनुदान शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.रेशीम कोष विक्रीचा प्रश्नही आता या रेशीम विक्री खरेदी केंद्राच्या माध्यमातून सुटला आहे. येणा-या काळात रेशीम धाग्यापासून कापड निर्मितीचा उद्योग जालन्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही खोतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRaosaheb Danweरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरMarketबाजारFarmerशेतकरी