शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पंधरा वर्षांपासून सिग्नल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:31 IST

नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील वाहतुकीवर नियंत्रण आणि शिस्त लावण्यासाठी ठिकठिकाणी सिग्नल कार्यान्वित केले. शहरात तब्बल १४ ते १५ सिग्नल बसविण्यात आले. मात्र नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत. मोठ्या संख्येने सिग्नल बंद पडल्यामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सुटीच्या दिवशी तर नियोजनाअभावी शहराची कोंडी होत आहे.शहरातील प्रमुख मार्गावरीलच सिग्नल बंद राहिल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण नाही.शहरातील कचेरी रोड, सिंधी बाजार, बसस्थानक, उडपी हॉटेल, शिवाजी पुतळा, शनी मंदिर, पाणीवेश यासह आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहे. मात्र येथील सिग्नल बंद असल्यामुळे चौकातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे आता जिल्हाधिका-यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.पादचा-यांना तरशहरात रस्ताच नाही!शहरात नाही म्हणायला पादचा-यांसाठी फुटपाथ केले आहेत; पण त्या फुटपाथवरही छोटे-मोठे व्यावसायिक, फेरीवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचा-यांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. कारण, कुठला वाहनधारक कधी येऊन धडक देईल, याची शाश्वती राहिलेली नाही. रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल असणाºया चौकात झेब्रा क्रॉसिंग नाहीत, अशावेळी रस्ता कसा ओलांडायचा? असा प्रश्न पादचा-यांना पडतो.दररोजच असते ट्रॅफिक जामबसस्थानक चौक, शनी मंदिर, गांधी चमन, पाणीवेश या ठिकाणी वाहनधारकांना दररोजच ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत कशी होईल, यावर भर देण्याची आवश्यकता आहे; पण आतापर्यंत तरी तसे ठोस प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.पार्किंगची ठिकाणे वाढविण्याची गरजबसस्थानक परिसर अशा काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे; पण वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता, हे पार्किंग पुरेसे नसल्याचे दिसते. त्यामुळे वाहने लावायची कुठे? असा प्रश्न वाहनधारकांना सतावतो.पार्किंग-नो पार्किंग फलक नसल्याने गोंधळात भरशहरातील काही मार्गांवर दिशादर्शक, पार्किंग, नो पार्किंग, वन-वे, सम-विषम तारखेचे फलक शोधूनही सापडत नाही. अशा स्थितीत वाहनधारकांना केवळ अंदाजाने वाहने चालवावी लागतात. त्यातून कधी-कधी नियम मोडला म्हणून वाहतूक पोलिसांकडून दंडही वसूल केला जातो. दिशादर्शक फलकांचा अभाव हेदेखील शहरातील वाहतूकीचा बोजवारा उडण्याचे प्रमुख कारण आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीJalana Muncipalityजालना नगरपरिषद