शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पंधरा वर्षांपासून सिग्नल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:31 IST

नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील वाहतुकीवर नियंत्रण आणि शिस्त लावण्यासाठी ठिकठिकाणी सिग्नल कार्यान्वित केले. शहरात तब्बल १४ ते १५ सिग्नल बसविण्यात आले. मात्र नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत. मोठ्या संख्येने सिग्नल बंद पडल्यामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सुटीच्या दिवशी तर नियोजनाअभावी शहराची कोंडी होत आहे.शहरातील प्रमुख मार्गावरीलच सिग्नल बंद राहिल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण नाही.शहरातील कचेरी रोड, सिंधी बाजार, बसस्थानक, उडपी हॉटेल, शिवाजी पुतळा, शनी मंदिर, पाणीवेश यासह आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहे. मात्र येथील सिग्नल बंद असल्यामुळे चौकातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे आता जिल्हाधिका-यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.पादचा-यांना तरशहरात रस्ताच नाही!शहरात नाही म्हणायला पादचा-यांसाठी फुटपाथ केले आहेत; पण त्या फुटपाथवरही छोटे-मोठे व्यावसायिक, फेरीवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचा-यांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. कारण, कुठला वाहनधारक कधी येऊन धडक देईल, याची शाश्वती राहिलेली नाही. रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल असणाºया चौकात झेब्रा क्रॉसिंग नाहीत, अशावेळी रस्ता कसा ओलांडायचा? असा प्रश्न पादचा-यांना पडतो.दररोजच असते ट्रॅफिक जामबसस्थानक चौक, शनी मंदिर, गांधी चमन, पाणीवेश या ठिकाणी वाहनधारकांना दररोजच ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत कशी होईल, यावर भर देण्याची आवश्यकता आहे; पण आतापर्यंत तरी तसे ठोस प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.पार्किंगची ठिकाणे वाढविण्याची गरजबसस्थानक परिसर अशा काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे; पण वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता, हे पार्किंग पुरेसे नसल्याचे दिसते. त्यामुळे वाहने लावायची कुठे? असा प्रश्न वाहनधारकांना सतावतो.पार्किंग-नो पार्किंग फलक नसल्याने गोंधळात भरशहरातील काही मार्गांवर दिशादर्शक, पार्किंग, नो पार्किंग, वन-वे, सम-विषम तारखेचे फलक शोधूनही सापडत नाही. अशा स्थितीत वाहनधारकांना केवळ अंदाजाने वाहने चालवावी लागतात. त्यातून कधी-कधी नियम मोडला म्हणून वाहतूक पोलिसांकडून दंडही वसूल केला जातो. दिशादर्शक फलकांचा अभाव हेदेखील शहरातील वाहतूकीचा बोजवारा उडण्याचे प्रमुख कारण आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीJalana Muncipalityजालना नगरपरिषद