शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

पंधरा वर्षांपासून सिग्नल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:31 IST

नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील वाहतुकीवर नियंत्रण आणि शिस्त लावण्यासाठी ठिकठिकाणी सिग्नल कार्यान्वित केले. शहरात तब्बल १४ ते १५ सिग्नल बसविण्यात आले. मात्र नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत. मोठ्या संख्येने सिग्नल बंद पडल्यामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सुटीच्या दिवशी तर नियोजनाअभावी शहराची कोंडी होत आहे.शहरातील प्रमुख मार्गावरीलच सिग्नल बंद राहिल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण नाही.शहरातील कचेरी रोड, सिंधी बाजार, बसस्थानक, उडपी हॉटेल, शिवाजी पुतळा, शनी मंदिर, पाणीवेश यासह आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहे. मात्र येथील सिग्नल बंद असल्यामुळे चौकातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे आता जिल्हाधिका-यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.पादचा-यांना तरशहरात रस्ताच नाही!शहरात नाही म्हणायला पादचा-यांसाठी फुटपाथ केले आहेत; पण त्या फुटपाथवरही छोटे-मोठे व्यावसायिक, फेरीवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचा-यांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. कारण, कुठला वाहनधारक कधी येऊन धडक देईल, याची शाश्वती राहिलेली नाही. रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल असणाºया चौकात झेब्रा क्रॉसिंग नाहीत, अशावेळी रस्ता कसा ओलांडायचा? असा प्रश्न पादचा-यांना पडतो.दररोजच असते ट्रॅफिक जामबसस्थानक चौक, शनी मंदिर, गांधी चमन, पाणीवेश या ठिकाणी वाहनधारकांना दररोजच ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत कशी होईल, यावर भर देण्याची आवश्यकता आहे; पण आतापर्यंत तरी तसे ठोस प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.पार्किंगची ठिकाणे वाढविण्याची गरजबसस्थानक परिसर अशा काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे; पण वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता, हे पार्किंग पुरेसे नसल्याचे दिसते. त्यामुळे वाहने लावायची कुठे? असा प्रश्न वाहनधारकांना सतावतो.पार्किंग-नो पार्किंग फलक नसल्याने गोंधळात भरशहरातील काही मार्गांवर दिशादर्शक, पार्किंग, नो पार्किंग, वन-वे, सम-विषम तारखेचे फलक शोधूनही सापडत नाही. अशा स्थितीत वाहनधारकांना केवळ अंदाजाने वाहने चालवावी लागतात. त्यातून कधी-कधी नियम मोडला म्हणून वाहतूक पोलिसांकडून दंडही वसूल केला जातो. दिशादर्शक फलकांचा अभाव हेदेखील शहरातील वाहतूकीचा बोजवारा उडण्याचे प्रमुख कारण आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीJalana Muncipalityजालना नगरपरिषद