शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 17:45 IST

बार्शीच्या आमदारांवर मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल: "देवेंद्र फडणवीस मराठ्यांना फसवण्याचं काम करत आहेत"

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टिका करून त्यांना चॅलेंज दिल आहे. जरांगे यांनी देखील आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर बार्शी येथिल मराठा बांधवांनी तब्बल ३०० गाड्याचा ताफा घेऊन शनिवारी अंतरवाली सराटी येऊन आमदार राजेंद्र राऊत यांच्या विषयी रोष व्यक्त केला. बार्शी येथे घोंगडी बैठक ठेवावी अशी विनंती बार्शी मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली.

आमदार राऊत यांनी जरांगे यांच्यावर आरोप केल्यानंतर जरांगे यांनी देखील राऊत यांचे आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले. दरम्यान, शनिवारी अंतरवाली सराटीत थेट बार्शीतून तब्बल ३०० गाड्या दाखल झाल्या. यावेळी झालेल्या बैठकीत बार्शीतून आलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी आमदार राऊत यांच्याबद्दल रोष व्यक्त केला. त्यानंतर जरांगे यांनी आमदार राऊत यांच्यावर धारदार टीका केली, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले. जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करत म्हटले की, "राऊत यांनी फितूरीचे संस्कार दाखवले आहेत. ते मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत." त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्याकडेही नाराजी व्यक्त करत, "मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं नाव खराब करण्यात येत आहे, आणि याचं उत्तर त्यांना दिलेच पाहिजे," असे सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत म्हटले की, "देवेंद्र फडणवीस मराठ्यांना फसवण्याचं काम करत आहेत. त्यांनी मराठा समाजात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "श्रीमंत लोकांना आरक्षणाची गरज नाही. त्यांना फक्त राजकारणासाठी मराठा समाजाची गरज आहे."

आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्यावर पत्रकार परिषदे काही आरोप केले. याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत, "तुला वेळ आल्यावर कळेल, देवेंद्र फडणवीसचे ऐकून तू किती चिखलात फसला आहेस," अशी सडकून टीका केली. तसेच मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराज, कल्पना राजे मासाहेब आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. तू कशाचाही शपथ घेतो, आम्हाला प्रश्न विचारणारा तू कोण? अशा शब्दात राऊत यांचा समाचार घेतला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस