शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
3
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
4
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
5
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
6
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
7
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
8
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
9
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
10
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
12
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
13
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
14
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
15
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
16
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
17
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
18
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
19
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
20
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप

"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 17:45 IST

बार्शीच्या आमदारांवर मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल: "देवेंद्र फडणवीस मराठ्यांना फसवण्याचं काम करत आहेत"

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टिका करून त्यांना चॅलेंज दिल आहे. जरांगे यांनी देखील आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर बार्शी येथिल मराठा बांधवांनी तब्बल ३०० गाड्याचा ताफा घेऊन शनिवारी अंतरवाली सराटी येऊन आमदार राजेंद्र राऊत यांच्या विषयी रोष व्यक्त केला. बार्शी येथे घोंगडी बैठक ठेवावी अशी विनंती बार्शी मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली.

आमदार राऊत यांनी जरांगे यांच्यावर आरोप केल्यानंतर जरांगे यांनी देखील राऊत यांचे आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले. दरम्यान, शनिवारी अंतरवाली सराटीत थेट बार्शीतून तब्बल ३०० गाड्या दाखल झाल्या. यावेळी झालेल्या बैठकीत बार्शीतून आलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी आमदार राऊत यांच्याबद्दल रोष व्यक्त केला. त्यानंतर जरांगे यांनी आमदार राऊत यांच्यावर धारदार टीका केली, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले. जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करत म्हटले की, "राऊत यांनी फितूरीचे संस्कार दाखवले आहेत. ते मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत." त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्याकडेही नाराजी व्यक्त करत, "मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं नाव खराब करण्यात येत आहे, आणि याचं उत्तर त्यांना दिलेच पाहिजे," असे सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत म्हटले की, "देवेंद्र फडणवीस मराठ्यांना फसवण्याचं काम करत आहेत. त्यांनी मराठा समाजात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "श्रीमंत लोकांना आरक्षणाची गरज नाही. त्यांना फक्त राजकारणासाठी मराठा समाजाची गरज आहे."

आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्यावर पत्रकार परिषदे काही आरोप केले. याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत, "तुला वेळ आल्यावर कळेल, देवेंद्र फडणवीसचे ऐकून तू किती चिखलात फसला आहेस," अशी सडकून टीका केली. तसेच मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराज, कल्पना राजे मासाहेब आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. तू कशाचाही शपथ घेतो, आम्हाला प्रश्न विचारणारा तू कोण? अशा शब्दात राऊत यांचा समाचार घेतला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस