शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

भाऊबंदकी दाखवा अन् तिकीट मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

केदारखेडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी अद्याप कोणत्याच पॅनलचे उमेदवार अंतिम झालेले ...

केदारखेडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी अद्याप कोणत्याच पॅनलचे उमेदवार अंतिम झालेले नाहीत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदान होईपर्यंत येणारा खर्च पॅनल प्रमुखांकडे असल्याने उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात आपल्या भाऊबंदकीतील मतदारांची आकडेमोड करता करता इच्छुकांच्या नाकीनऊ आले आहेत. या भाऊबंदकीच्या नादात ज्ञान, शिक्षण, वर्तणूक या बाबींना तिलांजली दिली जात आहे. केदारखेडा येथील ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांसाठी होणाऱ्या निवडणुकीत नऊ जागांसाठी अधिक जोर दोन्ही पॅनलकडून लावला जात आहे. भाजपापुरस्कृत दोन्ही पॅनल समोरासमोर लढत असले तरी भाजपाच्या एका गटाने राष्ट्रवादीचा आधार घेतला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार ? हे मतदार राजाच्या हातात आहे. प्रचारासाठी ११ दिवस असल्याने आतापासूनच प्रचाराचा धुराळा उडत आहे. अनेक वर्षे ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात असूनही पुन्हा गावाचा विकास करण्याची भाषा वापरली जात आहे. यावर काहींनी मग इतके दिवस काय केले ? असा खोचक सवाल सोशल मीडियावर विचारणे सुरू केले आहे. दोन्ही पॅनलमध्ये भाजपाचे कार्यकर्ते पॅनलप्रमुख असून, जुन्या विरुध्द नवा असा सामना रंगत आहे. होणारी निवडणूक विविध बाजूंनी रंगतदार होणार असली तरी सुज्ञ मतदार कोणाच्या पदरात संक्रांतीचे वाण टाकणार ? हे १८ जानेवारीलाच समोर येणार आहे.