शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:50 IST

तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. कार्यालय परिसरात बोअर असून सुध्दा नागरिकांना पाणी पिण्यास मिळत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. कार्यालय परिसरात बोअर असून सुध्दा नागरिकांना पाणी पिण्यास मिळत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.जुन्या तहसील कार्यालयाचे २०१४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर असलेल्या सुसज्ज नवीन इमारतीत करण्यात आले. मात्र सुरवातीपासून नूतन इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नसल्याने शहरासह ग्रामीण भागातून येणाºया नागरिकांचे हाल होत आहेत. तहसील कार्यालयात तालुक्यातील १२२ गावांतील नागरिकांचा नेहमीच राबता असतो. शेतकरी, वयोवृद्ध, निराधार लाभार्थ्यांचा समावेश असतो. तहसील कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधांची वानवा दिसून येते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे. शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी सुध्दा देण्यात येतो. मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे तब्बल पाच वर्षांपासून येथील तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकात संताप आहे. विशेष म्हणजे पाण्यासाठी लाख रूपये खर्च करून कार्यालय परिसरात बोअर खोदण्यात आला. त्याला मुबलक पाणी असताना तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून आत्तापासून चांगलेच ऊन तापत आहे.बुधवारी तहसील कार्यालयात आलेल्या एका ६८ वर्षीय वयोवृद्धाला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. जवळ पैशाची चणचण असताना नाईलाजाने त्यांना विकतचे पाणी प्यावे लागले. उन्हाळ्याचे दिवस बघता पाण्याअभावी नागरिकांची होत असलेली गैरसोय प्रशासन दूर करेल का, अशी विचारणा सर्वसामान्यांतून होत आहे.