शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

तहसीलमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:50 IST

तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. कार्यालय परिसरात बोअर असून सुध्दा नागरिकांना पाणी पिण्यास मिळत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. कार्यालय परिसरात बोअर असून सुध्दा नागरिकांना पाणी पिण्यास मिळत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.जुन्या तहसील कार्यालयाचे २०१४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर असलेल्या सुसज्ज नवीन इमारतीत करण्यात आले. मात्र सुरवातीपासून नूतन इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नसल्याने शहरासह ग्रामीण भागातून येणाºया नागरिकांचे हाल होत आहेत. तहसील कार्यालयात तालुक्यातील १२२ गावांतील नागरिकांचा नेहमीच राबता असतो. शेतकरी, वयोवृद्ध, निराधार लाभार्थ्यांचा समावेश असतो. तहसील कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधांची वानवा दिसून येते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे. शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी सुध्दा देण्यात येतो. मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे तब्बल पाच वर्षांपासून येथील तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकात संताप आहे. विशेष म्हणजे पाण्यासाठी लाख रूपये खर्च करून कार्यालय परिसरात बोअर खोदण्यात आला. त्याला मुबलक पाणी असताना तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून आत्तापासून चांगलेच ऊन तापत आहे.बुधवारी तहसील कार्यालयात आलेल्या एका ६८ वर्षीय वयोवृद्धाला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. जवळ पैशाची चणचण असताना नाईलाजाने त्यांना विकतचे पाणी प्यावे लागले. उन्हाळ्याचे दिवस बघता पाण्याअभावी नागरिकांची होत असलेली गैरसोय प्रशासन दूर करेल का, अशी विचारणा सर्वसामान्यांतून होत आहे.