शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे 'शॉर्टसर्किट'; शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांना ४४०चा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी ...

जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) शिवारातील शेतकऱ्यांना येत आहे. गत पंधरा दिवसांपासून या भागाला वीज पुरवठा करणारे रोहित्र जळाले आहे. परिणामी, पाण्याअभावी रब्बीतील पिकांना ‘शॉक’ बसत असून, ही पिके करपून जात आहेत.

गतवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातून खरीपातील पिके गेली आहेत. शासनाकडून वितरीत करण्यात आलेल्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आशा आता रब्बीतील पिकांवर आहेत. त्यातही रोगराईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटकाही अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. अंतरवाली दायी परिसरातील संपूर्ण पिके विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भुतेगाव येथील उपकेंद्रांतर्गत अंतरवाली भुतेगाव या भागातील संपूर्ण क्षेत्र आहे. परंतु, या भागाला वीजपुरवठा करणारे राेहित्र मागील पंधरा दिवसांपूर्वी जळालेले आहे. रोहित्र दुरूस्त करून द्यावे, यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांपासून तालुक्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला. परंतु, कर्तव्याचेच 'शॉर्टसर्किट' झालेल्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीला अद्यापही गांभीर्याने घेतलेले नाही. गत पंधरा दिवासंपासून पाणीच न मिळाल्याने या भागातील असंख्य शेतकऱ्यांचा गहू करपून जात आहे. विशेष म्हणजे जळणारी पिके पाहून या भागातील शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवर्गणी करण्याची तयारीही दर्शविली आहे. परंतु, ना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटतो ना अधिकाऱ्यांना ! याबाबत महावितरणचे उपअभियंता विपीन मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता या प्रश्नाकडे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष देऊन महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचनांचा ‘फ्यूज’ टाकावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

पाठपुरावा करून थकलो

आमच्या शेतीला वीजपुरवठा करणारे रोहित्र जळून पंधरा दिवसांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. परंतु, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो दुरूस्त करून दिलेला नाही. शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवाटा संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यालाही महावितरणचे अधिकारी दाद देत नाहीत.

विनोद बरसाले

शेतकरी

पिकांचे मोठे नुकसान

यापूर्वी पावसामुळे खरीपातील पिके वाया गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून रब्बीची पेरणी केली. पिके चांगली आल्याने काहीतरी हाती पडेल, अशी आशा होती. परंतु, पिकांना पाणी देण्यासाठी लाईट नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

मदन गोटे

शेतकरी,

फोटो कॅप्शन : विजेअभावी पाणी देता येत नसल्याने अंतरवाली दायी भागातील गहू असा वाळून जात आहे.