शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

महावितरण कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे 'शॉर्टसर्किट'; शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांना ४४०चा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी ...

जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) शिवारातील शेतकऱ्यांना येत आहे. गत पंधरा दिवसांपासून या भागाला वीज पुरवठा करणारे रोहित्र जळाले आहे. परिणामी, पाण्याअभावी रब्बीतील पिकांना ‘शॉक’ बसत असून, ही पिके करपून जात आहेत.

गतवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातून खरीपातील पिके गेली आहेत. शासनाकडून वितरीत करण्यात आलेल्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आशा आता रब्बीतील पिकांवर आहेत. त्यातही रोगराईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटकाही अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. अंतरवाली दायी परिसरातील संपूर्ण पिके विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भुतेगाव येथील उपकेंद्रांतर्गत अंतरवाली भुतेगाव या भागातील संपूर्ण क्षेत्र आहे. परंतु, या भागाला वीजपुरवठा करणारे राेहित्र मागील पंधरा दिवसांपूर्वी जळालेले आहे. रोहित्र दुरूस्त करून द्यावे, यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांपासून तालुक्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला. परंतु, कर्तव्याचेच 'शॉर्टसर्किट' झालेल्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीला अद्यापही गांभीर्याने घेतलेले नाही. गत पंधरा दिवासंपासून पाणीच न मिळाल्याने या भागातील असंख्य शेतकऱ्यांचा गहू करपून जात आहे. विशेष म्हणजे जळणारी पिके पाहून या भागातील शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवर्गणी करण्याची तयारीही दर्शविली आहे. परंतु, ना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटतो ना अधिकाऱ्यांना ! याबाबत महावितरणचे उपअभियंता विपीन मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता या प्रश्नाकडे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष देऊन महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचनांचा ‘फ्यूज’ टाकावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

पाठपुरावा करून थकलो

आमच्या शेतीला वीजपुरवठा करणारे रोहित्र जळून पंधरा दिवसांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. परंतु, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो दुरूस्त करून दिलेला नाही. शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवाटा संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यालाही महावितरणचे अधिकारी दाद देत नाहीत.

विनोद बरसाले

शेतकरी

पिकांचे मोठे नुकसान

यापूर्वी पावसामुळे खरीपातील पिके वाया गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून रब्बीची पेरणी केली. पिके चांगली आल्याने काहीतरी हाती पडेल, अशी आशा होती. परंतु, पिकांना पाणी देण्यासाठी लाईट नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

मदन गोटे

शेतकरी,

फोटो कॅप्शन : विजेअभावी पाणी देता येत नसल्याने अंतरवाली दायी भागातील गहू असा वाळून जात आहे.