शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

महावितरण कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे 'शॉर्टसर्किट'; शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांना ४४०चा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी ...

जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) शिवारातील शेतकऱ्यांना येत आहे. गत पंधरा दिवसांपासून या भागाला वीज पुरवठा करणारे रोहित्र जळाले आहे. परिणामी, पाण्याअभावी रब्बीतील पिकांना ‘शॉक’ बसत असून, ही पिके करपून जात आहेत.

गतवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातून खरीपातील पिके गेली आहेत. शासनाकडून वितरीत करण्यात आलेल्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आशा आता रब्बीतील पिकांवर आहेत. त्यातही रोगराईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटकाही अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. अंतरवाली दायी परिसरातील संपूर्ण पिके विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भुतेगाव येथील उपकेंद्रांतर्गत अंतरवाली भुतेगाव या भागातील संपूर्ण क्षेत्र आहे. परंतु, या भागाला वीजपुरवठा करणारे राेहित्र मागील पंधरा दिवसांपूर्वी जळालेले आहे. रोहित्र दुरूस्त करून द्यावे, यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांपासून तालुक्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला. परंतु, कर्तव्याचेच 'शॉर्टसर्किट' झालेल्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीला अद्यापही गांभीर्याने घेतलेले नाही. गत पंधरा दिवासंपासून पाणीच न मिळाल्याने या भागातील असंख्य शेतकऱ्यांचा गहू करपून जात आहे. विशेष म्हणजे जळणारी पिके पाहून या भागातील शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवर्गणी करण्याची तयारीही दर्शविली आहे. परंतु, ना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटतो ना अधिकाऱ्यांना ! याबाबत महावितरणचे उपअभियंता विपीन मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता या प्रश्नाकडे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष देऊन महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचनांचा ‘फ्यूज’ टाकावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

पाठपुरावा करून थकलो

आमच्या शेतीला वीजपुरवठा करणारे रोहित्र जळून पंधरा दिवसांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. परंतु, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो दुरूस्त करून दिलेला नाही. शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवाटा संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यालाही महावितरणचे अधिकारी दाद देत नाहीत.

विनोद बरसाले

शेतकरी

पिकांचे मोठे नुकसान

यापूर्वी पावसामुळे खरीपातील पिके वाया गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून रब्बीची पेरणी केली. पिके चांगली आल्याने काहीतरी हाती पडेल, अशी आशा होती. परंतु, पिकांना पाणी देण्यासाठी लाईट नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

मदन गोटे

शेतकरी,

फोटो कॅप्शन : विजेअभावी पाणी देता येत नसल्याने अंतरवाली दायी भागातील गहू असा वाळून जात आहे.