शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्ह्यात निवडणुकीसाठी शिवसेनेची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:11 IST

स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेत्यांना विविध विधानसभा मतदार संघांत पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेत्यांना विविध विधानसभा मतदार संघांत पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या दौ-याचा अहवाल नेत्यांना २८ फेब्रुवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करावा लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी याची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेने या जिल्ह्यासह राज्यातील विधानसभा मतदार संघांत याची चाचपणी सुरु केली आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांना पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्या-त्या जिल्ह्यातील मतदार संघात ३९ मुद्यांवर पक्षनिरीक्षक काम करीत आहेत. पक्षस्थिती, गावे, शाखांबाबत माहिती, लोकांचे मत, शिवसेनेने शेतक-यांसाठी केलेली विविध आंदोलने, जनमत संघटीत होऊ शकेल अशी तीन ज्वलंत प्रश्न पाहायचे, बुथ प्रमुखांच्या निवडी आदी मुद्यांचा पक्षनिरीक्षक अभ्यास करीत आहेत. त्याचप्रमाणे पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी काय केले पाहिजे याचीही चाचपणी विविध विधानसभा मतदार संघांत नेत्यांकडून केली जातआहे.२१ ते २३ फेब्रुवारी या काळात जबाबदारी दिलेल्या मतदार संघात चाचपणी केली जात आहे. या चाचपणीचा परिपूर्ण निरीक्षण अहवाल पक्षनिरीक्षक २८ फेब्रुवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.जालना जिल्ह्यात गणेश लटके यांना जालना, भोकरदन आणि बदनापूर या विधानसभा मतदार संघात पक्षनिरीक्षक म्हणून नेमले आहे. तर ओमराजे निंबाळकर यांच्याकडे परतूर आणि घनसावंगी या दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या हे दोन्ही नेते जालना जिल्ह्याच्या दौ-यावर असून, पक्षाची सद्यस्थिती जाणून घेत लोकांच्या भेटी आणि राजकीय वातावरण याबाबत निरीक्षण हे नेते करीत आहेत.जिल्ह्यातील शिवसेनेची परिस्थिती आणि लोकांचे मत याचा वरिष्ठ पातळीवर अभ्यास केला जाणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.अंबेकर, बोराडे, चोथेंकडे हे मतदार संघ..संपर्कप्रमुख शिवाजी चोथे यांच्याकडे नेवासा, श्रीरामपूर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्याकडे संगमनेर, शिर्डी आणि अकोले, तर ए.जे.बोराडे यांच्याकडे सोलापूर (पूर्व), बार्शी आणि मोहोळ या विधानसभा मतदार संघांची पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.