शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
4
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
5
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
6
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
7
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
8
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
9
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
10
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
11
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
12
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
13
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
14
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
15
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
16
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
17
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
18
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
19
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
20
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  

शांतीगिरी महाराजांकडून जालना शहरात ‘राजकारणाचे शुद्धीकरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:11 IST

वेरूळ येथील जय बाबाजी परिवाराचे प्रणेते श्री श्री १००८ शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात सोमवारी झालेल्या राजकारणाचे शुध्दीकरण कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वेरूळ येथील जय बाबाजी परिवाराचे प्रणेते श्री श्री १००८ शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात सोमवारी झालेल्या राजकारणाचे शुध्दीकरण कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शांतीगिरी महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राजकारण आणि राजकीय नेता कसा असावा यावर शांतीगिरी महाराजांनी सविस्तर मार्गदर्शन केले.जालना येथील जय बाबाजी परिवाराकडून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी पार पडला. यावेळी भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून शंभर टक्के मतदान केलेच पाहिजे, मतदान करताना पैशांच्या आमिषाला बळी न पडताते योग्य व्यक्तीला करून ते सत्पात्री लागले पाहिजे यासह राजकीय नेता कसा असावा, यावरही महाराजांनी मते मांडली. वंशपरंपरागत नेता असण्याऐवजी तो कर्तृत्ववान असला पाहिजे. पक्षाशी एकनिष्ठ हवा की, देशाशी एकनिष्ठ हवा असे अनेक प्रश्न श्रोत्यांना विचारून त्यांच्याकडूनही यावर उत्तरे जाणली.यावेळी जालना येथील जय बाबाजी परिवाराचे प्रमुख दत्तात्रेय शिराळे, बालू चाटला, किशोर गरदास, कन्नी कटलू, सुरेश गुंटूक यांच्यासह वेरूळ येथील मठाचे सचिव रामनंद महाराज, काकासाहेब गोरेंची उपस्थिती होती. दरम्यान २००९ मध्ये शांतीगिरी महाराजांनी औरंगाबाद मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यामुळे ऐन लोकसभेपूर्वीच या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणspiritualअध्यात्मिकSocialसामाजिक