शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जालन्यातील सात वर्षांचा अंधार हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:10 IST

गत सात वर्षे जालना नगरपालिकेने पथदिव्यांचे वीज बिल थकविल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरील अंधार आता दूर होणार आहे.

जालना : गत सात वर्षे जालना नगरपालिकेने पथदिव्यांचे वीज बिल थकविल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरील अंधार आता दूर होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विशेष बाब म्हणून मंजूर करवून घेतलेल्या साडेबारा कोटी रकमेतील काही रकमेचा विनियोग जालना नगरपालिकेने वीज बिल भरण्यासाठी अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना शनिवारी दिले.शहागड -अंबड- जालना या दहा किलोमीटर पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन येडशी- औरंगाबाद या रस्त्याचे चौपदरीकरणात गेल्यामुळे खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरपाई देण्याची मागणी केली होती. विशेष बाब म्हणून यासाठी लागणारा १२ कोटी ३५ लाखांचा निधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केला. सदर रक्कम खा. दानवे यांच्या आणि विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी आ. नारायण कुचे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी महापौर भगवान घडामोडे, अशोक पांगारकर, देविदास देशमुख, बद्रीनाथ पठाडे, सिद्धीविनायक मुळे, नगरसेवक सतीश जाधव, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, राजेश बाबरेकर, अमोल पाटील, योगेश विधाते, कार्यकारी अभियंता महेश पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर उपस्थित होते.