शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जालन्यातील सात वर्षांचा अंधार हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:10 IST

गत सात वर्षे जालना नगरपालिकेने पथदिव्यांचे वीज बिल थकविल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरील अंधार आता दूर होणार आहे.

जालना : गत सात वर्षे जालना नगरपालिकेने पथदिव्यांचे वीज बिल थकविल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरील अंधार आता दूर होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विशेष बाब म्हणून मंजूर करवून घेतलेल्या साडेबारा कोटी रकमेतील काही रकमेचा विनियोग जालना नगरपालिकेने वीज बिल भरण्यासाठी अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना शनिवारी दिले.शहागड -अंबड- जालना या दहा किलोमीटर पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन येडशी- औरंगाबाद या रस्त्याचे चौपदरीकरणात गेल्यामुळे खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरपाई देण्याची मागणी केली होती. विशेष बाब म्हणून यासाठी लागणारा १२ कोटी ३५ लाखांचा निधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केला. सदर रक्कम खा. दानवे यांच्या आणि विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी आ. नारायण कुचे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी महापौर भगवान घडामोडे, अशोक पांगारकर, देविदास देशमुख, बद्रीनाथ पठाडे, सिद्धीविनायक मुळे, नगरसेवक सतीश जाधव, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, राजेश बाबरेकर, अमोल पाटील, योगेश विधाते, कार्यकारी अभियंता महेश पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर उपस्थित होते.