शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीतील ४१६४ तक्रारींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : महाविकास आघाडी शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दाखल ४१७९ तक्रारींपैकी ४१६४ तक्रारींचा निपटारा जिल्हा समिती, तहसील ...

जालना : महाविकास आघाडी शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दाखल ४१७९ तक्रारींपैकी ४१६४ तक्रारींचा निपटारा जिल्हा समिती, तहसील कार्यालयाकडून करण्यात आला आहे. इतर १५ तक्रारी प्रलंबित असून, शेतकऱ्यांच्या कर्जापोटी आजवर एक हजार २० कोटी रूपये बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत.

आस्मानी- सुल्तानी संकटांच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार दोन लाखाच्या आतील संपूर्ण कर्ज माफ करण्यात आले होते. योजना जाहीर झाल्यानंतर बँक स्तरावरून जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ४० शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ७२ हजार ११७ कर्जखाती विशिष्ट क्रमांकासह प्रसिध्द करण्यात आली होती. याद्या प्रसिध्द झाल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ५९ शेतकऱ्यांनी आपलं सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण केले आहे. या याद्यांमध्ये काही त्रुटी असल्याने जिल्ह्यातील ४१७९ शेतकऱ्यांनी कर्जमाफी प्रक्रियेबाबत ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या. त्यातील २२७२ तक्रारी जिल्हा समितीने निकाली काढल्या असून, सात तक्रारी प्रलंबित आहेत. तर तहसील स्तरावरून १८९२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, आठ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, आधार प्राणिकरणानंतर आजवर शासनाकडून १ लाख ६२ हजार ४९१ कर्ज खात्यावरील १ हजार २० कोटी ६५ रूपये बँकांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त झाला आहे.

४०५७ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण रखडले

शासन स्तरावरून विशिष्ट क्रमांकासह कर्जखात्यांची यादी प्रसिध्द झाली आहे. परंतु जिल्ह्यातील ४०५७ कर्जखात्यांवरील आधार प्राणिकरणाची प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. आधार प्राणिकरणाची प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरी जाऊनही जनजागृती करण्यात आली आहे. परंतु, काही शेतकरी बाहेरगावी रहिवासी असल्याने व काहींचा मृत्यू झाल्याने ही प्रक्रिया रखडल्याचे सांगण्यात आले.

अनेकांना वाढीव घोषणेची आशा

शासनाने या कर्जमुक्तीत दोन लाखाच्या आतील कर्ज सरसकट माफ केले आहे. त्यामुळे आता दोन लाखावरील कर्ज माफ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेही अनेक जणांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही.

प्रोत्साहनपर अनुदान घोषणाही नाही

शासनाने आजवर दोन लाखावरील कर्ज खात्यावरील रक्कम बँकेत वर्ग केली आहे. परंतु नियमित कर्ज भरणाऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप जमा झालेले नाही. त्यामुळे नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांनाही कर्जमाफीतील शासनाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे

शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. यादीतील लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असेल तर वारसांनी आवश्यक ती कागदपत्रे बँकांकडे जमा करणे गरजेचे आहे. कागदपत्रे जमा केल्यानंतर शासन स्तरावरून नावात बदल करून योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

नानासाहेब चव्हाण

जिल्हा उपनिबंधक, जालना