वडीगोद्री : वृद्धाश्रमे कमी होण्याऐवजी ती वाढत आहेत. वृद्धाश्रमांची संख्या कमी करण्यासाठी युवकांनी आई-वडिलांची सेवा करावी. घराला मंदिर बनवून कर्तव्य पार पाडावे. आयुष्यात आपल्यासोबत काही येत नाही. केवळ चांगले कर्मच शिल्लक राहतात. ईश्वराकडे भाव असून, तो काही कमी पडू देत नाही, असे हभप भागवत महाराज कणके महाराज यांनी सांगितले.
अंबड तालुक्यातील भामानगर (भांबेरी) येथे ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत भागवत कथा, अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे होते.
नवनाथा पंथीय असलेले अडभंगनाथ महाराज याच्या तपोभूमी भामानगर (भांबेरी) मध्ये सुरू असलेल्या भागवत कथेमुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. यावेळी भागवत कथेत कणके महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.
फोटो