शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रामेश्वर सोनवणे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

डॉक्टर नसल्याने उपचार मिळेना भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे शटर नेहमीच बंद राहात आहे. त्यामुळे ...

डॉक्टर नसल्याने उपचार मिळेना

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे शटर नेहमीच बंद राहात आहे. त्यामुळे आजारी पशुधनाला घेऊन येणाऱ्या पशुपालक, शेतकऱ्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत.

जामखेड परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड परिसरात वन्यप्राणी कोवळ्या पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जामखेड व परिसरात अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचा समावेश आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यातच वन्यप्राणी उगवलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत.

कार्यालय सुरू करण्याची मागणी

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथे राज्य महावितरण कंपनीचे शाखा कार्यालय सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता पहुरकर यांना देण्यात आले. या निवेदनावर मंगेश गव्हाड, समाधान काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रिक्षाचालकांना मदतीची प्रतीक्षा

जालना : परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनी सादर केलेले अर्ज मंजूर करण्याची मागणी मराठवाडा ऑटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी महाराष्ट्र परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिक्षक क्लबतर्फे निबंध स्पर्धा

जालना : शहरातील शंभर शिक्षक क्लबतर्फे राज्यस्तरीय शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या दहा विजेत्या शिक्षकांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाईल. सहभागी सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

रमेश थोरवे यांचा अंनिसतर्फे सत्कार

जालना : जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी रमेश थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा अंनिसतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, प्रधान सचिव मधुकर गायकवाड, संजय हेरकर, प्रशांत वाघ, राजेंद्र साबळे, सेनाजी काळे, मयुर जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

विस्कळीत वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय

जालना : जालना तालुक्यातील रामनगर व परिसरातील वीजपुरवठा अचानक गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज अचानक गायब होत असल्याने ग्राहकांना एक ना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी उपलब्ध पाणी पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु विजेअभावी शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे.

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण - तंट्यात वाढ होत असून, कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.