शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

रामेश्वर सोनवणे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

डॉक्टर नसल्याने उपचार मिळेना भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे शटर नेहमीच बंद राहात आहे. त्यामुळे ...

डॉक्टर नसल्याने उपचार मिळेना

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे शटर नेहमीच बंद राहात आहे. त्यामुळे आजारी पशुधनाला घेऊन येणाऱ्या पशुपालक, शेतकऱ्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत.

जामखेड परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड परिसरात वन्यप्राणी कोवळ्या पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जामखेड व परिसरात अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचा समावेश आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यातच वन्यप्राणी उगवलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत.

कार्यालय सुरू करण्याची मागणी

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथे राज्य महावितरण कंपनीचे शाखा कार्यालय सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता पहुरकर यांना देण्यात आले. या निवेदनावर मंगेश गव्हाड, समाधान काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रिक्षाचालकांना मदतीची प्रतीक्षा

जालना : परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनी सादर केलेले अर्ज मंजूर करण्याची मागणी मराठवाडा ऑटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी महाराष्ट्र परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिक्षक क्लबतर्फे निबंध स्पर्धा

जालना : शहरातील शंभर शिक्षक क्लबतर्फे राज्यस्तरीय शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या दहा विजेत्या शिक्षकांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाईल. सहभागी सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

रमेश थोरवे यांचा अंनिसतर्फे सत्कार

जालना : जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी रमेश थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा अंनिसतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, प्रधान सचिव मधुकर गायकवाड, संजय हेरकर, प्रशांत वाघ, राजेंद्र साबळे, सेनाजी काळे, मयुर जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

विस्कळीत वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय

जालना : जालना तालुक्यातील रामनगर व परिसरातील वीजपुरवठा अचानक गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज अचानक गायब होत असल्याने ग्राहकांना एक ना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी उपलब्ध पाणी पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु विजेअभावी शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे.

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण - तंट्यात वाढ होत असून, कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.