शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सीड पार्कचे काम कासवगतीने...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:39 IST

४० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करू शकणारा आणि जवळपास ६ हजार कोटींची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या सीडपार्कचे काम कासवगतीने सुरु असून, हा प्रकल्प शासनाने मंजूर केला असला तरी आतापर्यंत केवळ मार्किंगच्या पलिकडे प्रकल्पाची फारशी प्रगती होऊ शकलेली नाही.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यातील ४० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करू शकणारा आणि जवळपास ६ हजार कोटींची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या सीडपार्कचे काम कासवगतीने सुरु असून, हा प्रकल्प शासनाने मंजूर केला असला तरी आतापर्यंत केवळ मार्किंगच्या पलिकडे प्रकल्पाची फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. केंद्र शासनाच्या अनुदानाबाबत साशंकता व्यक्त करत सीड कंपन्या या प्रकल्पासाठी फारशा उत्सुक दिसून येत नाहीत.जालन्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीडपार्क उभारण्याची घोषणा केली होती. जालना ही बियाणे उद्योगांची राजधानी असून, या उद्योगाचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा, या दृष्टीने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. मध्यंतरी सीड पार्कच्या कामाला गती देण्यासाठी मंत्रालयात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या प्रकल्पाची किंमत जवळपास १०९ कोटी रुपये असून, पानशेंद्रा परिसरात शासकीय मालकीची साधारण ३० हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. एमआयडीसीने हा प्र्रकल्प विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, प्लॉट मार्किंगच्या पलिकडेफारशी प्रगती या प्रकल्पाची होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, याबाबत अधिकारीही अनभिज्ञ आहेत. या प्रकल्पासाठी २२ प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पास केंद्र शासनाचे अनुुदान मिळण्याबाबत संभ्रम असल्याने सीड कंपन्यांनी पाठ फिरवली. त्यातच एमआयडीसीने नव्याने प्रस्ताव मागवले आहेत. यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.जालना तालुक्यातील पानशेंद्र येथे ९० एकरमध्ये होत असलेल्या सीडपार्कसाठी संपादित केलेल्या जागेबाबत खासगी शेतक-यांचे दावे आहेत. तसेच जुना आणि नवीन नकाशा यामुळेही प्रशासकीय पातळीवर वाद आहे. त्यामुळे सीडपार्कचे काम कासव गतीने होत आहेत. याला गती देण्यासाठी उच्चपदस्थ अधिका-यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.निर्णय फिरवला : मूळ उद्देश राहिला बाजूलासीड कंपन्या आणि महाबीज वा कृषी उद्योग विकास महामंडळ यांचा संयुक्त उपक्रम म्हणून सीडपार्कची उभारणी करण्याचा उद्देश शासनाचा होता. यात केंद्र शासनाचे ५० कोटी, राज्य शासनाचे २५ कोटी आणि उर्वरित रक्कम सीड कंपन्यांनी त्यांचा वाटा म्हणून भरायची होती. मात्र, कॅबिनेटच्या बैठकीत एमआयडीसीने पार्क विकसित करुन तो कंपन्यांना देण्याचे ठरले. जॉइंट व्हेंचरद्वारे शेतकºयांना सीडच्या माध्यमातून फायदा मिळवून देण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकारagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र