शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

मृतदेहाचा चोवीस तासांपासून शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:27 IST

मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

जालना / मठपिंपळगाव: मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा दोन दिवसांपासून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खोदकाम करीत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.पोलीस सूत्रांनी सांगितले, की अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील कचरु दशरथ रत्नपारखे यांचे अपहरण झाल्याची घटना आठ जून २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहा संशयितांवर गुन्हा दाखल आहे. सुरुवातीला अंबड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास फारसा गांभिर्याने घेतला नाही. दरम्यान, वार्षिक तपासणीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे अंबडला आले असता, मृत रत्नपारखे यांच्या आईने थेट महानिरीक्षकांकडे तक्रार करून आपल्या मुलाचा शोध लावण्याची मागणी केली होती. भारंबे यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेने शुक्रवारी गजानन सुदाम खेकडे व गणेश कारभारी जिगे (रा. मठपिंपळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कचरु रत्नपारखे यांचा खून करून मृतदेह मठपिंपळगाव शिवारातील एका विहिरीजवळ पुरल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी शनिवारपासून संशयितांनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम सुरू केले होते. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे रविवारी सकाळपासून पुन्हा जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आले. दुपारनंतर खोदकाम करताना एक हाड सापडले. मात्र, सापडलेले हाड जनावराचे असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. सायंकाळी अंधार झाल्यामुळे खोदकाम थांबविण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या प्रकरणात आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.-----------त्या जागेची रचना बदलली.मारेक-यांनी ज्या विहिरीशेजारी खड्डा खोदून कचरु रत्नपारखे यांचा मृतदेह पुरला, ती विहीर एका नाल्याला लागून आहे.घटनेला तब्बल सात काही महिने उलटून गेले. मधल्या काळात झालेल्या पावसामुळे नाल्याला पूर आल्याने या ठिकाणी माती व वाळू साचल्याने पूर्ण जागेची रचनाच बदली. त्यामुळे मारेकºयांनी मृतदेह नेमका कुठे पुरला, हे शोधणे कठीण झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.