शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

मृतदेहाचा चोवीस तासांपासून शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:27 IST

मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

जालना / मठपिंपळगाव: मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा दोन दिवसांपासून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खोदकाम करीत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.पोलीस सूत्रांनी सांगितले, की अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील कचरु दशरथ रत्नपारखे यांचे अपहरण झाल्याची घटना आठ जून २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहा संशयितांवर गुन्हा दाखल आहे. सुरुवातीला अंबड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास फारसा गांभिर्याने घेतला नाही. दरम्यान, वार्षिक तपासणीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे अंबडला आले असता, मृत रत्नपारखे यांच्या आईने थेट महानिरीक्षकांकडे तक्रार करून आपल्या मुलाचा शोध लावण्याची मागणी केली होती. भारंबे यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेने शुक्रवारी गजानन सुदाम खेकडे व गणेश कारभारी जिगे (रा. मठपिंपळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कचरु रत्नपारखे यांचा खून करून मृतदेह मठपिंपळगाव शिवारातील एका विहिरीजवळ पुरल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी शनिवारपासून संशयितांनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम सुरू केले होते. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे रविवारी सकाळपासून पुन्हा जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आले. दुपारनंतर खोदकाम करताना एक हाड सापडले. मात्र, सापडलेले हाड जनावराचे असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. सायंकाळी अंधार झाल्यामुळे खोदकाम थांबविण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या प्रकरणात आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.-----------त्या जागेची रचना बदलली.मारेक-यांनी ज्या विहिरीशेजारी खड्डा खोदून कचरु रत्नपारखे यांचा मृतदेह पुरला, ती विहीर एका नाल्याला लागून आहे.घटनेला तब्बल सात काही महिने उलटून गेले. मधल्या काळात झालेल्या पावसामुळे नाल्याला पूर आल्याने या ठिकाणी माती व वाळू साचल्याने पूर्ण जागेची रचनाच बदली. त्यामुळे मारेकºयांनी मृतदेह नेमका कुठे पुरला, हे शोधणे कठीण झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.