शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

मृतदेहाचा चोवीस तासांपासून शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:27 IST

मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

जालना / मठपिंपळगाव: मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा दोन दिवसांपासून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खोदकाम करीत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.पोलीस सूत्रांनी सांगितले, की अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील कचरु दशरथ रत्नपारखे यांचे अपहरण झाल्याची घटना आठ जून २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहा संशयितांवर गुन्हा दाखल आहे. सुरुवातीला अंबड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास फारसा गांभिर्याने घेतला नाही. दरम्यान, वार्षिक तपासणीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे अंबडला आले असता, मृत रत्नपारखे यांच्या आईने थेट महानिरीक्षकांकडे तक्रार करून आपल्या मुलाचा शोध लावण्याची मागणी केली होती. भारंबे यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेने शुक्रवारी गजानन सुदाम खेकडे व गणेश कारभारी जिगे (रा. मठपिंपळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कचरु रत्नपारखे यांचा खून करून मृतदेह मठपिंपळगाव शिवारातील एका विहिरीजवळ पुरल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी शनिवारपासून संशयितांनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम सुरू केले होते. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे रविवारी सकाळपासून पुन्हा जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आले. दुपारनंतर खोदकाम करताना एक हाड सापडले. मात्र, सापडलेले हाड जनावराचे असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. सायंकाळी अंधार झाल्यामुळे खोदकाम थांबविण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या प्रकरणात आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.-----------त्या जागेची रचना बदलली.मारेक-यांनी ज्या विहिरीशेजारी खड्डा खोदून कचरु रत्नपारखे यांचा मृतदेह पुरला, ती विहीर एका नाल्याला लागून आहे.घटनेला तब्बल सात काही महिने उलटून गेले. मधल्या काळात झालेल्या पावसामुळे नाल्याला पूर आल्याने या ठिकाणी माती व वाळू साचल्याने पूर्ण जागेची रचनाच बदली. त्यामुळे मारेकºयांनी मृतदेह नेमका कुठे पुरला, हे शोधणे कठीण झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.