शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख शेतकरी पीकविम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:04 IST

पीकविमा मंजूर होऊन महिनाभराचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही सव्वालाखावर शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम २०१८ मधील पिकाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ६५ कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर आहे. पीकविमा मंजूर होऊन महिनाभराचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही सव्वालाखावर शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला असून, पीकविम्याची रक्कमही मिळत नसल्याने त्यांच्या समोरील अडचणींचा डोंगर वाढत आहे.गतवर्षी पावसाच्या हलरीपणामुळे खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेला होता. पावसाअभावी यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा अद्यापही पत्ता नसल्याने यंदाचाही खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गतवर्षीच्या खरिप हंगामात पेरणीनंतर शेतक-यांनी सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, तूर व कापूस या पिकांसाठी लाखो शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ दुष्काळी स्थितीमुळे महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील पिकांची आणेवारी जाहीर केली़ नजर आणेवारी आणि अंतीम आणेवारीमध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद झाली होती़ शासनाच्या निर्णयानुसार विमा काढलेल्या क्षेत्रामध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट असेल तर त्या भागातील शेतक-यांना विमा नुकसान भरपाई देण्यात येते़दरम्यान, राज्य शासनाने जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याने शेतक-यांना पीक विमा मिळण्याच्या हालचालींना वेग आला होता़ गतवर्षीच्या खरिप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीकडून जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ५०१ शेतक-यांना ६५ कोटी ७९ लाख रूपयांचा पीकविमा मंजूर झाला होता. आजवर विमा कंपनीने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी व ज्वारी या पिकांचा विमा काढलेल्या जिल्ह्यातील १ लाख २३ शेतक-यांच्या खात्यावर ४५ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़ मात्र, अद्यापही जिल्हाभरातील सव्वा लाखावर शेतक-यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. पीकविम्यासाठी शेतक-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.निवेदन : विम्यापासून वंचित राहण्याची भीतीजालना : जालना तालुक्यातील गोलापांगरीअंतर्गत गोलापांगरी आणि गोलावाडी (गणेशनगर) अशी दोन स्वतंत्र महसुली गावे आहेत. परंतु पीकविमा भरताना गणेशनगर गावाचा समावेश नाही. त्यामुळे गणेशनगर या गावातील शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे.त्यामुळे गोलावाडी या गावाच्या नावात बदल करून शेतक-यांना पीकविमा भरण्यासाठी गणेशनगर या गावाचा समावेश करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर नरेश अवघड, अक्षय गायकवाड, सचिन अवघड, एकनाथ जिगे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र