शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

सव्वालाख शेतकरी पीकविम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:04 IST

पीकविमा मंजूर होऊन महिनाभराचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही सव्वालाखावर शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम २०१८ मधील पिकाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ६५ कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर आहे. पीकविमा मंजूर होऊन महिनाभराचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही सव्वालाखावर शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला असून, पीकविम्याची रक्कमही मिळत नसल्याने त्यांच्या समोरील अडचणींचा डोंगर वाढत आहे.गतवर्षी पावसाच्या हलरीपणामुळे खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेला होता. पावसाअभावी यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा अद्यापही पत्ता नसल्याने यंदाचाही खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गतवर्षीच्या खरिप हंगामात पेरणीनंतर शेतक-यांनी सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, तूर व कापूस या पिकांसाठी लाखो शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ दुष्काळी स्थितीमुळे महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील पिकांची आणेवारी जाहीर केली़ नजर आणेवारी आणि अंतीम आणेवारीमध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद झाली होती़ शासनाच्या निर्णयानुसार विमा काढलेल्या क्षेत्रामध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट असेल तर त्या भागातील शेतक-यांना विमा नुकसान भरपाई देण्यात येते़दरम्यान, राज्य शासनाने जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याने शेतक-यांना पीक विमा मिळण्याच्या हालचालींना वेग आला होता़ गतवर्षीच्या खरिप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीकडून जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ५०१ शेतक-यांना ६५ कोटी ७९ लाख रूपयांचा पीकविमा मंजूर झाला होता. आजवर विमा कंपनीने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी व ज्वारी या पिकांचा विमा काढलेल्या जिल्ह्यातील १ लाख २३ शेतक-यांच्या खात्यावर ४५ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़ मात्र, अद्यापही जिल्हाभरातील सव्वा लाखावर शेतक-यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. पीकविम्यासाठी शेतक-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.निवेदन : विम्यापासून वंचित राहण्याची भीतीजालना : जालना तालुक्यातील गोलापांगरीअंतर्गत गोलापांगरी आणि गोलावाडी (गणेशनगर) अशी दोन स्वतंत्र महसुली गावे आहेत. परंतु पीकविमा भरताना गणेशनगर गावाचा समावेश नाही. त्यामुळे गणेशनगर या गावातील शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे.त्यामुळे गोलावाडी या गावाच्या नावात बदल करून शेतक-यांना पीकविमा भरण्यासाठी गणेशनगर या गावाचा समावेश करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर नरेश अवघड, अक्षय गायकवाड, सचिन अवघड, एकनाथ जिगे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र